काँग्रेस शासित राजस्थानमध्ये संघाच्या बाल शाखेवर पूर्वनियोजित हल्ला

    13-Jul-2019
Total Views | 223


 


हल्लेखोर पन्नास; पण गुन्हे दाखल मात्र तीन जणांवर


राजस्थान : काँग्रेस शासित राजस्थान मध्ये बुधवारी शाखा भरवण्यासाठी जमलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर पूर्वनियोजित पद्धतीने हल्ला करण्यात आला. बुंदी जिल्ह्यातील नवलनगर पार्क येथे कार्यक्रमासाठी संघाचे स्वयंसेवक एकत्रित आले होते. काही समाजकंटकांच्या जमावाने तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात रा. स्व. संघाच्या काही तरुण आणि बाल कार्यकर्त्यांना दुखापत झाली आहे.

 

घटनेनंतर संघाच्या स्वयंसेवकांनी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली आहे. जवळपास पन्नास जणांच्या जमावाने केलेल्या या हल्ल्यात पोलीस प्रशासनाने केवळ पाच जणांच्या विरोधात एफ. आय. आर. नोंदवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राजवटीत राजस्थानचे केरळ होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

पोलीस अधीक्षक ममता गुप्ता यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हल्ल्याच्या प्रकरणात सद्दाम, शफी मोहम्मद, शाहिद या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचे पडसाद राजस्थान विधानसभेत ही उमटले. आमदार मदन दिलवार यांनी संबंधित प्रकरण विधानसभेत लावून धरले. राजस्थान भाजपच्या आमदारांनी काँग्रेस सरकारला विधिमंडळात धारेवर धरल्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यात आल्याचे समजते. तथापि काँग्रेसच्या राज्यात आता संघ स्वयंसेवकांची मुस्कटदाबी केली जात असल्याचे बोलले जात आहे तर एवढ्या मोठ्या जमावाने हा हल्ला केला, ही मॉब लिंचिंग नाही का? अशी प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटताना दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

आ. राजन नाईक यांची सहकार राज्यमंत्र्यांकडे नवीन उपनिबंधक कार्यालयाची मागणी

आ. राजन नाईक यांची सहकार राज्यमंत्र्यांकडे नवीन उपनिबंधक कार्यालयाची मागणी

तालुक्याची लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या आसपास आहे, त्यानुसार या भागात जवळपास आठ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था, १५ पत पेढ्या, 3 नागरी सहकारी बँका, १९ सेवा संस्था व १ बाजार समिती आहेत. परंतु वसई तालुक्यात एकच उपनिबंधक कार्यालय असल्यामुळे, नागरिकांना विविध कामांसाठी किंवा तक्रारीचे निवारण करण्यासाठी वसई येथील उपनिबंधक कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, यामुळे नागरिकांची वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी मंगळवार दिनांक १० जून रोजी महाराष्ट्र सरकारचे सहकार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121