डब्ल्यूटीओ मंत्रिस्तरीय बैठकीचे यजमानपद भारताला

    11-May-2019
Total Views | 52




नवी दिल्ली : विकसनशील देशांच्या डब्ल्यूटीओ मंत्रिस्तरीय बैठकीचे यजमानपद भारताने स्वीकारले आहे. येत्या १३ आणि १४ मे रोजी नवी दिल्लीत ही बैठक होणार आहे. सोळा विकसनशील राष्ट्रे, सहा कमी विकसनशील राष्ट्रे या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

 

विकसनशील राष्ट्रे आणि कमी विकसनशील राष्ट्रांना एका मंचावर आणून जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित चिंताजनक विविध सामायिक मुद्यांवर चर्चा करून त्यांचे निराकरण करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. बहुपक्षीय नियमाधारित व्यापार यंत्रणेसमोर गंभीर आणि मोठी आव्हाने असताना ही बैठक होत आहे. त्यामुळे यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

 

अर्जेंटिना, बांगलादेश, बार्बाडोस, बेनिन, ब्राझील, इजिप्त, ग्वाटेमाला, इंडोनेशिया, कझाकस्तान, नायजेरिया, ओमान, सौदी अरेबिया, टर्की, युगांडा या देशांचे उपमंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि राजदूत आपापल्या देशांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

राज्य सरकारकडून २० हजार ७८७ कोटींची तरतूद १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किलोमीटरचा महामार्ग नागपूर ते गोवा १८ तासांचा प्रवास ८ तासांत महाराष्ट्रात धार्मिक यात्रा करण्याची थोर परंपरा असून जनसामान्य त्यानिमित्याने मोठ्या प्रमाणात पर्यटन करतो. या पर्यटनामुळे आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांना जोडणारा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121