जगातील प्रभावी १०० लोकांच्या यादीमध्ये ३ भारतीय

    18-Apr-2019
Total Views | 257


 


नवी दिल्ली : जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि अमेरिकेच्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'टाईम' या मासिकाने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्रसिद्ध केलेल्या यादीत जगातील सर्वात प्रभावशाली नेते, उद्योजक, कलाकार आणि प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. यातील १०० जणांच्या यादीमध्ये भारतातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.

 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, भारतात एलजीबीटीयू समुदायांच्या लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी या तीन भारतीयांचा यादीमध्ये समावेश आहे. तर, इतर नावांमध्ये जगभरात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची नवे आहेत. अमेरिकन टीव्ही एंकर हसन मिन्हझ, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पोप फ्रान्सिस, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान, प्रसिद्ध गोल्फर टाइगर वुड्स, अमेरिकेचे माजी प्रथम महिला मिशेल ओबामा, अमेरिकन अभिनेत्री लेडी गागा, अबू धाबीचे युवराज मोहम्मद बिन जायद आणि फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांचाही यादीत समावेश आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121