विमाने पाडल्याचे पुरावे द्या, भारताचे पाकिस्तानला आव्हान

    09-Mar-2019
Total Views | 47

 

 
 
 
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला एक महिना होत आला. तरी पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. याबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी उचलली तरीदेखील पाकिस्तानने हात वर केले आहेत. पाकिस्तानने असे करणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हणत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी संताप व्यक्त केला आहे.
 

मसूद अजहर हा पाकिस्तानमध्येच असून त्याच्यावर कारवाई केली जात नाही. भारताची दोन विमाने पाडल्याचा पाकिस्तानने केलेला दावा खोटा असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान पाडले होते. त्याचे पुरावे भारताकडे आहेत. पाकिस्तानने त्यांच्याकडे असलेले पुरावे सादर करावेत. असे आव्हान रवीश कुमार यांना भारताकडून पाकिस्तानला दिले आहे.

 

पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. भारताने याबाबतचे पुरावे पाकिस्तानला दिले. पण पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कोणतीच कारवाई केली नाही. २६ फेब्रुवारीला पाकिस्तानातील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून भारताने पुलवामाचा बदला घेतला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे ‘जैश-ए-मोहम्मद’ चा हात असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी सांगितले. तरीदेखील पाकिस्तान ही गोष्ट नाकारत आहे. जर पाकिस्तान नवी विचारांचा आहे असा दावा करत असेल तर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी. अशी मागणी रवीश कुमार यांनी केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121