हल्ला पाकिस्तानात धक्का मात्र विरोधीपक्षांना : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    05-Mar-2019
Total Views | 56
 

मध्यप्रदेश : नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या विरोधी पक्षांवर मंगळवारी तोफ डागली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी वायुदलाने हवाई हल्ला करून जैश ए मोहम्मदचे तळ उध्वस्त केले. देशवासीयांनी भारतीय वायुदलाच्या या कामगिरीचे कौतूक केले. मात्र, विरोधक या कारावईचे पुरावे मागत आहेत. दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानात उध्वस्त केले मात्र, धक्का भारतातल्या काहीजणांना बसला, असा टोला त्यांनी विरोधी पक्षांना लगावला.

  

एअर स्ट्राईक अर्थात हवाई हल्ला पाकिस्तानात बालाकोटमध्ये झाला मात्र, त्याचा धक्का मात्र भारतातल्या काहीजणांना बसला, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर तोफ डागली. दहशतवादी हल्ला झाला की भारत तोडीस तोड उत्तर देतो. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करतो. मात्र, त्याचेही राजकारण भारतातले काही लोक करतात. हे आपले दुर्दैव, असे पंतप्रधान म्हणाले.

 

मध्यप्रदेशात झालेल्या भाजपाच्या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा त्यांनी शत्रू राष्ट्राला कधीही चोख प्रत्युत्तर दिले नाही. आता मात्र आपल्या शूर जवानांच्या कामगिरीवर या विरोधकांनी संशय घेत आहेत. यावरून त्यांची मानसिकता काय हे लक्षात येते असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. २६/११ च्या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला क्लिन चिट कुणी दिली?, असाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121