सीबीआय विरूद्ध ममता बॅनर्जी : सर्वोच्च न्यायालयाचा ममता दीदींना जोरदार झटका

    05-Feb-2019
Total Views | 281
 
 

नवी दिल्ली : सीबीआय विरुद्ध ममता बॅनर्जी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. शारदा चिटफंड आणि रोज व्हॅली प्रकरणात सीबीआयला चौकशी करू द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त, राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

 

चीट फंड गैरव्यवहारप्रकरणात कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआयअधिकाऱ्यांनाच कोलकाता पोलिसांनी गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात आणले होते. लॉडन स्ट्रिटवर रंगलेल्या या नाट्याचे स्वरूप ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार असे झाले. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

 
 

अ‍ॅटर्नी जनरल जनरल वेणुगोपाल यांनी सीबीआयच्या वतीने बाजू मांडली. राजीव कुमार हे चीट फंड गैरव्यवहारातील विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. सीबीआयकडे तपासातील मुळ कागदपत्रे दिलीच नाहीत. तपासासंदर्भातील कॉल रेकॉर्ड्समध्येही फेरफार केल्याचा आरोप कुमार यांच्यावर आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचा दावा सीबीआयने सुप्रीम कोर्टासमोर केला.

 
 

युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर राहण्याचे आणि चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले असून सीबीआयने देखील राजीव कुमार यांना अटक करु नये, असा दिलासा कुमार यांना दिला आहे. सरन्यायाधीश गोगोई यांच्या पीठाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि राजीव यांना नोटीस बजावली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

 
 

पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडणारे अभिषेक मनू सिंघवी यांनी या आदेशांना विरोध दर्शवताच सुप्रीम कोर्टाने सिंघवी यांना प्रतिप्रश्न केला. कोलकाता पोलीस आयुक्तांना सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास तुम्ही का विरोध दर्शवत आहात, असा सवाल न्यायालयाने विचारला. राजीव कुमार यांची शिलाँग येथे चौकशी करावी, असेही सुप्रीम कोर्टाने सीबीआयला सांगितले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121