राहुल गांधी बॅंकॉक दौऱ्यावर एकटे जाणार नाहीत ! 'हे' आहे कारण...

    07-Oct-2019
Total Views | 124

 

 
 

 

नवी दिल्ली : विशेष सुरक्षा दलाद्वारे महत्वाच्या व्यक्तींना देण्यात येणारी सुरक्षा आता आणखी कडक करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या नियमावलींचे पालन करण्याच्या निर्देशांसह आता परदेशात जातानाही एका सुरक्षा गटाला सोबत नेणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते, राहुल गांधी, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ही सुरक्षा पुरवण्यात येते. त्यामुळे परदेश दौऱ्यासाठी चर्चेत असलेल्या राहुल गांधी यांना बॅंकॉकला एकटे जाता येणार नाही. 

भाजप नेते टॉम वडक्कन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिमहत्वाच्या व्यक्तींची जबाबदारी सरकारची असते. त्यामुळे प्रत्येक व्हीव्हीआयपी व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी सुरक्षितता पोहोचवण्याचे काम हे सुरक्षा बल करत असते. दिवसरात्र सुरक्षा देणे हे या सुरक्षा बलाचे काम आहे. कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा हेतू यात नाही. त्यामुळे अशा व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत काही गैरप्रकार झाल्यास केंद्राला जबाबदार धरले जाऊ शकते म्हणून ही नियमावली कडक करण्यात आली आहे. त्यानुसार आता परदेश दौऱ्यातही ही सुरक्षा पुरवली जाणार आहे.

दरम्यान, कॉंग्रेसच्या नेत्यांनी सरकारने आमच्यावर नजर ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. मात्र, भाजपने हा मुद्दा खोडून काढत सुरक्षेच्या कारणास्तव हा बदल करण्यात आल्याचे म्हटले आहे. यापूर्वी गृहमंत्रालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या विशेष सुरक्षेचा दर्जा रद्द केला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

'ती' चप्पल कोल्हापुरीच! समाजमाध्यमांवरील टीकेनंतर 'प्राडा'ने सोडले मौन

इटली येथे पार पडलेल्या प्राडा कंपनीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलांचा वापर करत, त्याला ' इटालियन लेदर फुटवेअर डिझाईन' म्हणून विकणे, आता प्राडाला चांगलंच महागत पडलं आहे. प्राडा या कंपनीने आपल्या नावाचा टॅग लावत कोल्हापुरी चपला तब्बल १ लाखापेक्षा जास्त किंमतीने विकण्याचा घाट घातला होता. प्राडाच्या या कारभरानंतर, त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली होती. सोशल मिडीयावर याबद्दल प्रतिक्रीयांचा पाऊस तर पडलाच, त्याचबरोबर कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कारागीरांनी सुद्धा संताप व्यक्त केला होता. परंतु आता प्राडाने..

गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल - येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करु भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची माहिती

गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल - येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करु भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची माहिती

स्वयंपुनर्विकासाचा विषय पुढे जावा, योजनेकारिता पैसे उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली ‘दरेकर समिती’ नेमली. हे जबाबदारीचे शिवधनुष्य आहे. जनतेचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून अपार कष्ट करत मी महाराष्ट्राचा दौरा केला, बैठका घेतल्या. ३१३ पानांचा अहवाल तयार असून त्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर पुढील आठवड्यात सरकारला सादर करू, अशी माहिती भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष व दरेकर समितीचे प्रमुख प्रविण दरेकर यांनी दिली...

योग क्रांती ते शिक्षण क्रांती! भारतीय ज्ञानशाखांच्या प्रसारासाठी ४ विद्यापीठं एकत्र

योग क्रांती ते शिक्षण क्रांती! भारतीय ज्ञानशाखांच्या प्रसारासाठी ४ विद्यापीठं एकत्र

भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा विचार आपल्याला पदोपदी आढळून येतो. याच पारंपरिक विचारांचा, आधुनिक शिक्षण व्यवस्थेसोबत मेळ साधत, भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी भारतातील ४ विद्यापीठांनी एकत्र येऊन, सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्याच्या अंतर्गत भारतीय शिक्षणव्यवस्था, आयुर्वेद, योगा या गोष्टींचा समावेश आहे. या कराराच्या माध्यमातून पतंजली विद्यापीठ, राजा शंकर शाह विद्यापीठ, हेमचंद यादव विद्यापीठ, आणि महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय ही चार विद्यापीठं एकत्र आलेली आहेत. पतंजली विद्यापीठाचे..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121