फेरीवाल्यांवर कारवाई केली नसल्याने एक दिवसाचा पगार कट

    15-Oct-2019
Total Views | 40




डोंबिवलीतील फेरीवाला अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा
एक दिवसाचा पगार कट


डोंबिवली(प्रतिनिधी): निवडणुका असल्याने काम जास्त असल्याची सबब पुढे करत कामात आळशीपणा करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा रेल्वे पूल दुरूस्तीसाठी बंद केल्याने डोंबिवलीकरांना वळण घेऊन मधल्या पुलावरून स्कायवॉकवर यावे लागते. मात्र स्कायवॉकवर आल्यावर फेरीवाल्यांचा दोन्ही बाजूने घोळका पाहून नागरिक पालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत आहेत.या फेरीवाल्यांना हटवण्याचे सोडून पालिका कर्मचारी गप्पा मारत उभे असतात.त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला हे कर्मचारी जबाबदार आल्याचा ठपका ठेवत त्याचा एका दिवसाचा पगार कट होणार आहे.तसे पत्र प्रभाग क्षेत्र अधिकारी उपयुक्तांना देणार आहेत.


पालिकेच्या स्कायवॉकवर काही दिवसांपासून फेरीवाले बसत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.त्यात भिकारी, गर्दुल्ले यांनीही स्कायवॉकवर बस्तान मांडले आहे.पालिकेचे फेरीवाला हटाव पथकाचे कर्मचारी निवडणुकीच्या कामाचा बोजा असल्याने किती काम करणार अशी सबब पुढे करत आहेत.नागरिकांनी याबाबत पालिकेच्या कामकाजावर बोट दाखवले असल्याने पालिकेने कर्मचाऱ्यांना त्याचा एका दिवसाचा पगार कट करण्याचा निर्णय घेतला आहे.तसे पत्र प्रभाग क्षेत्र अधिकारी उपायुक्तांकडे देणार आहेत उपायुक्तांनी अश्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी डोंबिवलिकर करत आहेत.तर डोंबिवलीतील 'ग' प्रभाग क्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप आणि 'फ'प्रभाग क्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांचेही अश्या कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष नसल्याचे असे बोलले जात आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121