श्रीनगर : जम्मू काश्मिरच्या सीमारेषेवर पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या कुरापतींना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकीस्तानचे अनेक बंकर्स उध्वस्त केले आहेत. या वर्षातला हा सर्वाधिक मोठा स्ट्राईक आहे.
काश्मिरातील शांतता भंग करण्यासह सीमेपलीकडून घुसखोरीसारख्या कुरापती पाकच्या लष्कराकडून सुरू असतात. गुरुवारी भारतीय सैन्याने या कारवाया हाणून पाडल्या. सीमारेषेवर पाकच्या सैन्याकडून वारंवार होत असलेल्या उल्लंघनाला पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
पुंछ आणि राजौरी क्षेत्रात घुसखोरी सुरू होती. याच भागातील पाच सैनिकांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. भारतीय जवानांनी पाकीस्तानचे १२ बंकर उध्वस्त केले आहेत, अशी माहिती लष्करी अधिकारी रणबीर सिंग यांनी दिली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/