महाराष्ट्रातील संतांच्या चरित्रावर आधारित १३ खंडांचा समावेश असलेल्या 'संतदर्शन चरित्र-ग्रंथा'चे आज पुणे येथे प्रकाशन केले. या ग्रंथाचे संपादक डॉ. सदानंद मोरेजी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकरजी, चैतन्यमहाराज देगलूरकरजी यावेळी उपस्थित होते. pic.twitter.com/WaBJGU7IqA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2018
या संतदर्शन चरित्र संचात वारकरी संप्रदायातील ३८ संतांच्या चरित्रांचा समावेश असून संतांच्या व्यक्तित्व, कर्तुत्व आणि कवित्व यांची ओळख यातून होते. या ३५०० पृष्ठांमध्ये हा संपूर्ण सार समाविष्ट करणाऱ्या १२ लेखकांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार! pic.twitter.com/DfdpknzSmW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2018
आपली संतपरंपरा फार मोठी आहे. महाराष्ट्राच्या समाजमनात त्याचे प्रतिबिंब दिसून येते. महाराष्ट्रधर्म आणि मराठी विचार, मराठी संस्कृती समृद्ध होण्याचे मूळ हे या संतपरंपरेत आहे. संतांनी केवळ समाजाची नाही, तर संपूर्ण विश्वाच्या मांगल्याची कामना केली! pic.twitter.com/D9nkABMAt2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2018
ज्ञानोबारायांनी विश्वकल्याणाचा मंत्र दिला, तर अध्यात्म आणि भौतिक जीवनाची सांगड घालून उत्तम माणूस कसा घडवायचा, हे संत तुकोबारायांनी शिकविले. महाराष्ट्राच्या आजच्या स्वरूपाच्या निर्मितीचे बीज हे त्या संत कालखंडातच रोवले गेले होते. pic.twitter.com/yZuahkIEIL
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2018
संत साहित्यातील तत्व, विचार, सत्य हे वास्तविकतेच्या आधारावर आणि आजच्या पिढीच्या परिस्थितीसापेक्ष मांडणे, ही काळाची गरज आहे, त्यातूनच खऱ्या अर्थाने नव्या पिढीपर्यंत संतसाहित्य पोहोचेल! pic.twitter.com/i138xLcjKE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2018