जपानमध्ये महापूर ; १५ लाख लोकांना पुराचा फटका

    08-Jul-2018
Total Views | 44



हिरोशिमा : गेल्या दोन दिवसांपासून जपानमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून जवळपास १५ लाख नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. दरम्यानदेशात ठिकठिकाणी आलेल्या पुरामध्ये अनेक जण वाहून गेले असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेणे सुरु आहे.


जपानच्या पश्चिम भागासह हिरोशिमा आणि आसपासच्या भागामध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडून पडल्या आहेत. याचबरोबर डोंगराळ भागांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक ठिकठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.






तसेच येत्या दोन दिवसांमध्ये देशामध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जपानच्या हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आपापले निवासस्थान सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन जपान सरकारने केले आहे.  

अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121