कांचनकलेची किमया...

    13-Jul-2018   
Total Views | 11


 

कांचन यांचा कलाक्षेत्रातील प्रवासही तसा अगदी खडतर. कुठल्याही कलामहाविद्यालयातून रीतसर शिक्षण न घेता कांचनने आवडीपोटी कुंचला हाती घेतला
 

उत्तम कलाकार होण्यासाठी ती कला अगदी उपजत असावी लागते. रीतसर शिक्षणाने निश्‍चितच हातच्या कलेला धार लावता येते, सफाईदारपणाही आत्मसात करता येतो. पण, सकलमनाने कलासक्त असणार्‍यांना शिक्षणाचे बंध कधीही अडसर ठरत नाहीत. मुंबईच्या कलाकार कांचन महंते या त्यांपैकीच एक. नुकतेच जहांगीर कलादालनातील त्यांचे बुद्धांच्या आखीवरेखीव चित्रांचे प्रदर्शन पार पडले आणि विशेष म्हणजे त्यांची सगळीच्या सगळी चित्रं चांगल्या किमतीला विकलीही गेली. त्यांच्या कॅनव्हासने बुद्धमुद्रांमधील टिपलेले भाव मनाला खरंच बुद्धांच्या करुणेच्या, अहिंसेच्या मार्गाकडे घेऊन जातात....

 

आज याच आवडीसाठी त्यांनी आपले जीवन पूर्णत: समर्पित केले. गाठीशी पैसे नसताना, पै अन् पै वाचवून केवळ कलेसाठी त्या जगत होत्या. सहसा, या क्षेत्रातील अनुभवाप्रमाणे, नवोदित कलाकारांसाठी सुरुवातीचा काळ हा निश्‍चितच आव्हानात्मक ठरतो. विशेषत्वाने असे कलाकार ज्यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमीही अगदी मध्यमवर्गीय असते. कुटुंबाकडूनही कलाकारांना बर्‍याचदा आधार मिळतोच असे नाही. म्हणूनच कांचन अशा कलाकारांना सल्ला देतात की, “केवळ आवड असेल तरच या क्षेत्रात उतरा, पैशासाठी कुंचला हाती घेऊ नका.” कारण, पैशासाठी चित्र रंगवल्यावर ती विकली जातीलच याची शाश्‍वती नाही, पण तीच चित्रं जर जीव ओतून रेखाटली, तर ती मेहनत कामी येतेच. त्यामुळे याच क्षेत्राला अगदी चिकटून राहिलो, धीर ठेवला की यश नक्कीच मिळते, हेही कांचन सांगायला विसरत नाहीत.

 

आगामी काळातही अशीच कलारसिकांना मंत्रमुग्ध करतील, अशी चित्रं कांचन यांच्या कुंचल्यातून रंगत राहो, हीच सदिच्छा...

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराच्या जाळ्यात नुकताच ऋतुजा राजगेसारख्या गर्भवती, सुशिक्षित युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा छळ करण्यात आला. या घटनेनंतर आता तरी आरक्षणाचा लाभ घेणार्‍या समाजाला जागं होणं अत्यावश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षण व्यवस्था धर्मांतरासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी होती. शतकानुशतके शोषित राहिलेल्या घटकांना सन्मानाने उभं राहता यावं म्हणून होती. मात्र, आज जिहादी आणि ख्रिस्ती मिशनरी वृत्तीने प्रेरित झालेल्या धर्मांतरितांकडून, या व्यवस्थेचा दुरुपयोग ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121