रस्ताबंद झाल्याने कचर्याच्या गाड्याच्या लांबचलांब रांगा

    06-Jun-2018
Total Views |



कल्याण : कल्याण महापलिका क्षेत्रात कचर्‍याचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. सततच्या आगी लागण्याच्या घटनानमुळे कल्याण डम्पिंग ग्राउंड चर्चेत असताना त्याकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने या परिसरात कचरा वाहून नेणार्‍या गाड्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागत असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. तर दुसरीकडे वेळीच कचरा उचलला जात नसल्याने शहरात साचणार्‍या कचर्‍यामुळे घाण, दुर्गंधी व रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना या कागदोपत्री प्रयत्नान बाबत मात्र नागरिक नाराज आहेत. शहरातील कचरा कुंड्या या ऐन दुपारपर्यंत भरून वाहत असतात तो उचलण्यासाठी महपालिकेची यंत्रणा अपुरी पडत आहे. अशातच कल्याण डम्पिंग ग्राउंडवर जाणारा रस्ता बंद झाल्याने डम्पिंग परिसरात कचरा वाहून नेणार्‍या गाड्यांच्या भल्या मोठ्या रांगा दिसून येतात. नजीकचा आलेला पावसाळा आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्याशी संपर्क साधला असता. सोमवारी पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी जाणार्‍या गाड्या घसरत होत्या त्यामुळे हा रस्ता बंद होता. पण आता सुरळीत चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौरांनी दिली भेट

संबंधित घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महपालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी डम्पिंग ग्राउंडला भेट दिली व येत्या काही दिवसात हा रस्ता मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121