इव्हीएमचा सर्वात जास्त फटका भाजपला : मुख्यमंत्री

    31-May-2018
Total Views | 23



मुंबई :
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये खराब झालेल्या इव्हीएम मशीनचा सर्वात जास्त फटका हा भारतीय जनता पक्षाला बसला असून निवडणूक आयोगाने याची योग्य ती दखल घ्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पालघर आणि भंडारा लोकसभा पोटनिवडणुकांच्या निकालानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते.

'मतदानादरम्यान इव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे भाजपचा पारंपारिक मतदार बनलेला सुशिक्षित वर्ग हा आपला मतदानाचा हक्क बजावू शकला नाही. अनेक तरुण हे सकाळीच मतदानाला आले परंतु मशीन्स बंद पडल्यामुळे ते तसेच माघारी फिरले. त्यामुळे याचा एकूणच फटका भाजपला बसला. तसेच गोंदियामध्ये अनेक दिवसानंतर पहिल्यांदा दुष्काळ पडल्यामुळे त्याठिकाणी असलेले वातावरण देखील बदलले असून त्याचा देखील परिणाम या निवडणुकांवर झाला आहे,' असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच भंडारामध्ये झालेला पराभव आम्ही मान्य करत असून पालघर आणि भंडारा येथील उमेदवारांचे अभिनंदन करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

सत्तेतील पक्षांनी अशा प्रकारची निवडणूक लढाऊ नये

पालघर निवडणुकी दरम्यान भाजप आणि सेने या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी एकमेकांवर अनेक टीका केल्या. तसेच ही निवडणूक म्हणजे दोन्ही पक्षांच्या अस्मितेचा प्रश्न असे मनात धरत ही निवडणूक लढवली. परंतु सत्ते असलेल्या पक्षांनी अशी निवडणूक लढवावी का ? या गोष्टीचा विचार सर्वांनी करावा आणि आता निवडणूक संपली आहे हे देखील ध्यानात घेईन, एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121