तीन भारतीय अंतराळवीर घेणार 'गगन'भरारी; इस्त्रोच्या १० हजार कोटींच्या मोहिमेला मंजूरी

    28-Dec-2018
Total Views | 73
 
 

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) अंतराळात मानव पाठविण्याची मोहीम आखली असून या मोहिमेचे नाव गगनयान’, असे ठेवण्यात आले आहे. मोहिमेतर्गंत तीन मानवांना सात दिवसांसाठी अंतराळात पाठविले जाणार आहे. मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदिल दाखविला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली आहे. या मोहिमेसाठी १० हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे. 

 

गगनयान मोहिम २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी केली. तीन मानवांना अंतराळात सात दिवसांसाठी पाठवून तेथे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे प्रयोग घेण्यात येतील, हा या मोहिमेचा उद्देश असणार आहे.

 

भारताच्या नावे होणार हा विक्रम

 

केंद्र सरकारची अंतराळात मानव पाठविण्याची मोहीम यशस्वी झाल्यास भारत हा अंतराळात मानव पाठविणारा अमेरिका, रशिया आणि चीन नंतरचा चौथा देश ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121