(Jalgaon) जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या पाईपलाईनची चोरी झाली होती. या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली. परंतु या प्रकरणाचा खरा सूत्रधार असल्याचा आरोप असणारे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन मात्र अद्यापही फरार आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
Read More
ठाणे : ( Thane ) ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पात ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यामुळे स्टेमची पाणी उचल क्षमता वाढुन नागरिकांची जलचिंता दूर होणार आहे.
भारत-बांगलादेश या देशांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले गेले आहे. विस्तारवादी चीनला रोखण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन भारत वेळोवेळी बांगलादेशाला आर्थिक मदत करण्याबरोबर तेथील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत असतो.
बांधकाम, पायाभूत सुविधा, वाहन उद्योग, अभियांत्रिकी आणि संरक्षण इ. देशातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पोलाद क्षेत्राची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. गेल्या काही वर्षांत देशातल्या पोलाद उद्योगाने लक्षणीय प्रगती केली आहे. त्यामुळे भारताने पोलाद उद्योगात एक ‘जागतिक शक्ती’ म्हणून नावलौकिक मिळवला असून जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या पोलादाची निर्मिती करणारा देश ठरला आहे.
बांगलादेशच्या निर्मितीत भारताची महत्त्वाची भूमिका होती. एवढेच नाही, तर बांगलादेशला मान्यता देणारा पहिला देशही भारतच होता. डिसेंबर १९७१ साली स्वतंत्र झाल्यानंतर बांगलादेशने भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणताही देश असो तो भावनेपेक्षा स्वहिताला अधिक प्राधान्य देत असतो. बांगलादेश आपल्या फायद्यासाठी भारतासोबत चीनसोबतही जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश आणि भारताचे संबंध बिघडले, अशा बातम्या पेरूनही त्याचा काहीही परिणाम होत नाही. दरम्यान
अमेरिकेतील जो बायडेन यांचे सरकार ’नॉर्ड स्ट्रीम’ इंधन वायूवाहिनी उद्ध्वस्त करण्यात अमेरिकेचा काहीही हात नाही, हे घसा कोरडे करून सांगत असले, तरी फक्त आणि फक्त अमेरिकेकडे हे घडवून आणण्याबद्दलचे तंत्रज्ञान आणि त्यासाठीच्या सुविधा असल्याने अमेरिकेकडेच संशयाची सुई वळते, हे निश्चित.
मुंबई महापालिकेचे माजी सत्ताधारी असणार्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनाच पालिकेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून शेवटी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
महिन्याभरात पूर्ण होणारे रस्तेदुरूस्तीचे काम, तीन महिने उलटून गेले तरी पूर्ण झालेले नाही. कामातील या दिरंगाईमुळे दहिसर पश्चिम येथील प्रभाग क्र. ७ मधील नागरिकांबरोबरच स्थानिक व्यापार्यांनाही व्यापारामध्ये नुकसानाला सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती तेथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात महत्वाचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १३ महापालिकांपाठोपाठ मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
‘स्मार्ट सिटी’चा दावा करणार्या ठाणे शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून ‘येनकेन’प्रकारे पाणीपुरवठ्याचे रडगाणे सुरूच आहे. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणार्या ‘स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन’कंपनीच्यावतीने माणकोली एम.बी.आर येथे स्टेमच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्यात येणार असल्याने ‘झोनिंग’ पद्धतीने पाणी पुरवले जाणार आहे
भातसा धरणाच्या वीज पुरवठा केंद्रात बिघाड झाल्याने मुंबईकरांना आधीच पाणी टंचाईला समोर जावे लागत असताना आता जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया जाण्याची घटना बुधवारी घडली आहे
तानसा पाइपलाइन मुलुंड पुल रस्ता घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महानगरपालिका व ठाकरे सरकार यांच्याविरोधात लोक आयुक्तांकडे आज दि. ९ डिसेंबर रोजी याचिका दाखल केली.
पाच वर्षांत पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची गुंतवणूक
पहिली दक्षिण आशियायी सीमापार तेल पाईपलाईन भारत-नेपाळ दरम्यान सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाईपलाईनचे संयुक्तपणे उदघाटन केले.
मुंबईचा खाडी किनारा, समुद्र किनारा प्रदूषित करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे मानवी मलजल. हे मलजल सध्या प्रक्रिया करुन समुद्रात सोडले जात असले तरी त्या पाण्याची गुणवत्ता परिपूर्ण नाही. या सर्व प्रक्रियेची माहिती देणारा हा लेख...
’ममता प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेतर्फे अंधेरी येथे ‘महिला सक्षमीकरण : आर्थिक व सामाजिक’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेपाठोपाठ आता शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामांनादेखील महिनाभरात सुरुवात होणार आहे.