भुयारी गटार योजनेचे काम महिनाभरात होणार सुरू

    26-Apr-2018
Total Views | 27

पहिल्या टप्प्यात १३७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

 
 
जळगाव :
अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेपाठोपाठ आता शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामांनादेखील महिनाभरात सुरुवात होणार आहे. शासनाच्या मान्यतेनंतर मनपाकडून गुरुवारी १३७ कोटी १० लाख रुपयांची निविदा काढण्यात येणार आहे.
 
 
भुयारी गटार योजना १४६.६४ कोटींची असून, पहिल्या टप्प्यात १३७ कोटींच्या निधीतून ही कामे होणार आहेत. साधारणपणे जून महिन्यात हे काम सुरु होण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिकेचा अमृत योजनेत समावेश करण्यात आला असून, त्यातून पाणीपुरवठा योजनेच्या कामांना सुरवात देखील झाली आहे. महापालिकेने शासनाला सादर केलेल्या पाणीपुरवठा योजनेचा ४०० कोटी रुपयांचा प्रस्ताव स्वीकारून मनपाचा अमृतमध्ये समावेश केला. याच योजनेतून भुयारी गटारींचे कामे देखील होणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीमुळे जळगावात पुन्हा एकदा विकास होत आहे.
 
१३१ किमीची टाकली जाईल पाईपलाईन
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहरात १३१.७९ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. तसेच उच्च दाबाची मुख्य वाहिनी १५० मीटरची राहणार आहे. यासह ४८ एमएलडीचे मलनिस्सारण केंद्र देखील तयार करण्यात येणार आहे. या योजनेतून ४० हजार प्रॉपर्टी कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121