भारताने आपले पहिले ध्रुवीय संशोधन जहाज (Polar Research Vessel - PRV) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी कोलकात्याच्या ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स’ (GRSE) आणि नॉर्वेच्या कोंग्सबर्ग कंपनी यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला आहे. हा करार नॉर्वेतील ओस्लो येथे झाला. या वेळी केंद्रीय पोर्ट्स, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.
Read More
एमएमआरडीए पारदर्शक आणि नागरिककेंद्री प्रशासनाच्या दिशेने
आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मागणी केल्यानंतर ‘आरोग्य भवन’ येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. “आंध्र प्रदेशात महाराष्ट्राच्या बरोबरीने अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली असून आजच्या घडीला चेन्नईत मोठ्या प्रमाणावर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या काहीसा मागे पडला आहे,” असे आ. प्रा. फरांदे यांनी स्पष्ट केले.
भारतीय राष्ट्रदर्शन विकसित होण्यासाठी किमान १५ ते २० हजार वर्षे लागली. त्यामुळे आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाश्चात्य देशांच्या ’नेशन’ या संकल्पनेशी भारताच्या ’राष्ट्र’ या संकल्पनेची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, आपल्याकडे बहुराष्ट्रवाद नाही. आपल्या संस्कृतीत एकतेचा संदेश आहे. आपण भूमीला ’माता’ मानतो. त्यामुळे ’नेशन’ आणि ’राष्ट्र’ या भिन्न संकल्पना आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान आयोजित
कायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करून बेकायदेशीर गर्भपात करणार्यांना चाप लावण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असून अवैध गर्भलिंगनिदान केंद्राची माहिती देणार्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राची ९० दिवसांनी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून उल्लंघन करणार्या आणि त्रुटी आढळणार्या केंद्रांवर कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. तसेच २०२४-२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या तपासणीमध्ये चार संशयित केंद्रांवर प्राधिकृत अधि
मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच
( Global Skills Center in Maharashtra on lines of Singapore ) महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने गुरुवार, दि. 3 एप्रिल रोजी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा के
Australia मध्ये नुकतेच ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्राच्या अनेक शाखांना टाळे ठोकण्यात आले आहे. या केंद्रांच्या शाखा जगभरातल्या 160 देशांमध्ये आहेत आणि यामध्ये दहा दशलक्ष विद्यार्थी चिनी भाषा आणि संस्कृती शिकत आहेत. अशा या केंद्रांना बंद करण्याचे पाऊल ऑस्ट्रेलियाने का उचलले? ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्र नक्की काय आहे?
( AI Centers to be established in Maharashtra ) कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे (एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्स) स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी ‘मायक्रोसॉफ्ट’सोबत सामंजस्य करार करण्यात आला. शासन व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी उपयोगासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.
conversion इस्लामचा प्रसार हा गेल्या काही दशकांत जागतिक स्तरावर वेग घेत आहे. त्याचे जसे सामाजिक परिणाम आहेत, तसेच राजकीय परिणामही आहेत. सध्या अमेरिका आणि केनिया या देशांत इस्लाम स्वीकारणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. धर्मप्रसार केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर त्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भही असतात. कोणत्याही देशाच्या मूळ संस्कृतीवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणारा हा बदल, सहजतेने स्वीकारला जाऊ शकत नाही. इस्लामचा हा वाढता प्रभाव केवळ वैय
टेक्सासमधील पशुपालन, शेती आणि कापूस उत्पादन यांसारख्या पारंपारिक उद्योगांबरोबरच ऊर्जाक्षेत्रांनेही भरारी घेतली आहे. यासोबतच विमान कंपन्या, प्रवास, मनोरंजन आणि तंत्रज्ञान (संगणक, अंतराळ आणि दूरसंचार) यांसारख्या अन्य उद्योगांना आज लक्षणीय महत्त्व प्राप्त झाले आहे. काही प्रमाणात या उद्योगांना देशातील सरकारकडून विशेषतः ‘एरोस्पेस’ उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि निधीही मिळाला. उदाहरणार्थ, ‘टेक्सास ए अॅण्ड एम विद्यापीठा’चे २०० दशलक्ष डॉलर्सचे नवीन अंतराळकेंद्र ह्यूस्टनमधील ‘नासा’च्या ‘जॉन्सन स्पेस सें
भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..
(Bhandara)तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे दि. ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषबाधा झालेल्या २२ रुग्णांनी बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर अन्य ७-८ जणांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
पाच लाख रुग्णांवर उपचार, एक लाखांहून अधिक शस्त्रक्रिया आणि दहा हजारांहून अधिक लॅसिक उपचार... २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम करणार्या डोंबिवलीच्या डॉ. अनघा अनिल हेरूर या खर्या अर्थाने नेत्रचिकित्सा क्षेत्रातील कर्मयोगिनी ठरल्या आहेत. त्यांचा नेत्रदीपक प्रवास जाणून घेऊया....
हिंदू हिंदूशी जोडण्यासाठी ‘विश्व हिंदू परिषदे’च्या ‘मातृशक्ती आयामा’तर्फे मुंबईतील पवई, विक्रोळी येथे सेवा वस्तीतील महिलांसाठी शिलाई केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले. स्वयंरोजगारातून आता महिलाशक्ती एकवटली आहे. या हिंदूहितैषी उपक्रमाचा आढावा घेणारा हा लेख...
भारतीय संगीत, वाद्य, तालशास्त्र आणि भारतीय पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देणार्या स्वोजस बिलुरकर यांच्याविषयी...
सेमीकंडक्टर या आधुनिक तंत्रज्ञानासाठी भारत एकेकाळी, बाहेरील देशांवर अवलंबून होता. मात्र, या क्षेत्रातसुद्धा भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी कंबर कसली आहे. सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी लागणारी सर्व संसाधने, भारताकडे व्यापक स्वरूपात आहेत. त्यामुळेच सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे...
पालघर आयटीआयमध्ये सुरु करण्यात आलेल्या मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून वर्षभरात अधिकाधिक युवकांना रोजगार मिळणार आहे, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी व्यक्त केला.
मुंबई : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी व्यक्त केला.
जगाच्या पाठीवर आपले प्रभुत्व आणि एकूणच दरार्यातून दादागिरी दाखविण्यासाठी सैन्यशक्तीची चढाओढ ही तशी शतकानुशतके सुरू आहे. अगदी महायुद्धपूर्व काळापासून ते आजच्या आधुनिक युगातही, कित्येक साम्राज्यांचा उदयास्त झाला, तरी ही पराकोटीची सामरिक स्पर्धा तसूभरही शमलेली नाही आणि भविष्यातही ती शमणे नाही. उलट तंत्रज्ञानाने जशी कूस बदलली, तसाच सैन्यदलाच्या आधुनिकीकरणानेही प्रचंड वेग धारण केला. म्हणूनच आता पारंपरिक भूदल, नौदल आणि वायुदलाच्या पलीकडे अंतराळ दल, सायबर सुरक्षा दल अशी काळाची पाऊले ओळखून, आधुनिक सैन्यबळाकडे प्रत
ठाणे : केंद्र शासनाच्या आजी-माजी कर्मचार्यांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही महिन्यात ठाण्यातील चरई येथील ‘एमटीएनएल’मधील जागा (वेलनेस सेंटर) ( Wellness Center ) आरोग्य केंद्रासाठी मंजूर झाली आहे. केंद्र शासनाच्या निवृत्त कर्मचार्यांच्या ‘सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन’ या संघटनेने ठाण्यात ‘सीजीएचएस’चे ‘वेलनेस सेंटर’ (केंद्रीय स्वास्थ्य योजना) सुरू व्हावे, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली होती.
इतिहासातील साधने ही अभ्यासाच्या दृष्टीने ( Pune Currency ) फार महत्त्वाची, इतिहाच्या साधनांमुळे त्याकाळातील अनेक घटकांचे पुरावेच अभ्यासकासमोर येत असतात. त्यातूनच काळाचा पट अभ्यासकासमोर उभा राहून, त्यातून सत्य समोर येत असते. अशा इतिहासाच्या साधनांमध्ये नाण्यांचे महत्त्व फार. मराठ्यांच्या इतिहासाचे मुख्य केंद्र असलेल्या पुण्यातील नाण्यांचा घेतलेला हा आढावा...
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने मेसर्स ट्रायडेंट ॲग्रोकॉम एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कन्सोर्टियम) यांना निर्यात-आयात सह देशांतर्गत कृषी कमोडिटी-आधारित प्रक्रिया आणि साठवण सुविधा उभारण्यासाठी पुरस्कार पत्र जारी केले. या प्रकल्पासाठी अंदाजे २८४ कोटी रुपये इतका खर्च येईल. हे केंद्र पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये २७ एकर जमिनीवर बांधण्यात येणार आहे.
(Urdu Bhavan) मुंबई महापालिका क्षेत्रातील भायखळा मतदारसंघातील आग्रीपाडा विभागामध्ये उर्दू भाषिक अध्ययन केंद्र (उर्दू भवन) उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. बेघरांसाठी राखीव असलेल्या या भूखंडावर आरक्षण बदलून उर्दू भवनाचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याला तीव्र विरोध दर्शवत भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांनी महापालिकेला उर्दू भवनाचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे. तसे पत्र त्यांनी गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी मुंबई महापालिकेला पाठवले आहे.
ठाणे : ठाण्यातील शास्त्रीनगर क्र. १ मधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’ आणि ‘आरोग्य केंद्र’ ( Health Center ) उभारणीचा प्रस्ताव शिवसेनेचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. त्याची वर्कऑर्डरही निघाली आहे.
मुंबई : “काँग्रेस ( Congress ) जिथे जिथे सत्तेत होती, तिथे तिथे तीव्र गतीने भ्रष्टाचार वाढला. काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणमध्ये खोटी आश्वासने दिली आणि भ्रष्टाचार करून लोकांना लुटले,” असा घणाघात हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी केला आहे. मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ येथे त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
(Constituent Building)जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारतीय लोकशाहीचा पाया संविधान अर्थात राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा प्रचार-प्रसार आणि जनजागृती व्हावी, याकरिता देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जात आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुमारे १२० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली असून, निविदा प्रसिद्ध केली आहे.
ठाण्यातील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अवकाश निरीक्षण केंद्राचे (Dr. APJ Abdul Kalam Space Observatory) उदघाट्न सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. काशिनाथ देवधर यांच्याहस्ते उदघाट्न होणार आहे.
राजधानी दिल्लीमध्ये स्पर्धापरीक्षेची तयारी करणार्या तीन विद्यार्थ्यांचा साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने, दिल्लीच्या राज्य दरबारची संपूर्ण यंत्रणाच हादरली आहे. प्रामाणिकपणाने कायद्याचे राज्य आपने चालवले असते, तर निश्चितच आज असा मृत्यू त्या विद्यार्थ्यांच्या नशिबी आला नसता. दिल्लीतील बिघडलेल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा...
नवी दिल्लीतील शकूरपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे रिझवान नावाचा शिक्षक जेएमडी कोचिंग सेंटरमध्ये हिंदू विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करत असल्याचे समोर आले आहे. तो त्यांना देवाची पूजा सोडून अल्लाची पूजा करण्यास सांगत होता. आता कोचिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
शनिवार, दि. २५ मे २०२४ रात्री उशिरा दिल्लीतील विवेक विहार भागात असलेल्या एका बेबी केअर सेंटरमध्ये आग लागली, ज्यामध्ये सात नवजात बालकांचा मृत्यू झाला. याशिवाय पाच नवजात बालकांची प्रकृती चिंताजनक असून त्यापैकी एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
भारत हा मंदिरांचा देश. या मंदिरांना केवळ धार्मिक-आध्यात्मिक महत्त्व नाही, तर ही मंदिरे आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील एक महत्त्वाचा भाग आहेत. मात्र, तरीही व्यवस्थापनाच्या बाबतीत ही मंदिरे काहीशी दुर्लक्षितच. तेव्हा या धर्तीवर मुंबई विद्यापीठाने ‘मंदिर व्यवस्थापन प्रशिक्षण अभ्यासक्रम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू अध्यासन केंद्र यांच्या पुढाकारातून साकार होत असलेला हा अभ्यासक्रम नेमका काय आहे आणि त्याचे शैक्षणिक पटलावर काय परिणाम होतील, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘सेंटर फॉर हिंदू फिलोसॉफिकल स्टड
'विज्ञानाचा समाजाला फायदा होऊ शकतो असे म्हणणे पुरेसे नाही, परंतु प्रत्यक्षात तसे होणे आवश्यक आहे. विज्ञानांचे लाभार्थी मग विज्ञानचे प्रवर्तक होतील अशा समाजात विज्ञान कधीच मरणार नाही' असे प्रतिपादन प्रो. डॉ. वी. एन जगताप (S.N. Bose नॅशनल सेंटर फॉर वेसिक सायन्सचे अध्यक्ष) यांनी केले.दादरच्या कीर्ती महाविदयालयात स्व. जयंतराव सहस्त्रबुध्दे हयांच्या जयंतीनिमित्त 'जयंतस्मृती' या कार्यक्रमात 'भारताच्या सर्व समावेशक विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान' या व्याख्यानात ते बोलत होते. समाजपयोगी विज्ञानासाठी आपण काय केलं
मार्च महिन्याच्या मध्यातच महाराष्ट्रातील धरणांनी, तलावांनी तळ गाठला आहे. कमी-अधिक प्रमाणात दरवर्षी मार्च महिना उजाडला की दुर्देवाने उन्हाइतक्याच तीव्र पाणीटंचाईच्या झळाही जाणवू लागतात. केवळ ग्रामीण भागांतच नाही, तर शहरी भागांमध्येही अशीच स्थिती. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर शेजारच्या कर्नाटकमधील बंगळुरुमध्येही पाणीटंचाईच्या समस्येने असेच भीषण रुप धारण केले आहे. तेव्हा, पाणीटंचाईच्या या समस्येवर पावसाच्या पाण्याची पद्धतशीर साठवणूक हा एक शाश्वत उपाय. पर्जन्यजल व्यवस्थापन, संवर्धन आणि साठवणूक या क्षेत्रात कार्यर
वझे - केळकर महाविद्यालय, मुलुंड (पूर्व) येथे 'वॉटर नॉलेज सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले आहे. दि. १४ मार्च २०२४ रोजी 'वॉटर नॉलेज सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले. पाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याकरिता वझे-केळकर महाविद्यालयाकडून सदर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
आज रविवार, दि. ३ मार्च रोजी रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमाचे पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण तामिळनाडूतील ‘सेवा भारती’ आणि केरळमधील ‘भारतीय विचार केंद्रम्’ या संस्थांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा संपन्न होईल. त्यानिमित्ताने जनकल्याण समितीसह ‘सेवा भारती’ आणि ‘भारतीय विचार केंद्रम्’ यांच्या सेवाकार्याची ओळख करुन देणारा हा लेख...
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT), दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. बी.ए., बी.कॉम., एम.ए. आणि एम.कॉम. या दूरस्थ शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी शुक्रवार, दिनांक २३/०२/२०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर (आयसीटीसी) हे कॅन्सरग्रस्तांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे. गेल्या 4 महिन्यांच्या कालावधीत कॅन्सरमुळे गंभीर आजारी असलेल्या तिघा रुग्णांना जीवदान देण्यात इथल्या डॉक्टरांना यश आले आहे.
काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या ललित कला केंद्रात रामायण विडंबन नाट्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रकार घडला. त्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठे ही नेमकी शिक्षणाचे माहेरघर की विद्रोहाचे अड्डे, असा प्रश्न उपस्थित झाला. वर्षभरापूर्वी ‘आयआयटी मुंबई’त दर्शन सोळंकीच्या आत्महत्येच्या घटनेने विद्यापीठ प्रशासनाचा ‘हिंदूफोबिया’ असाच चव्हाट्यावर आला होता. तेव्हा, या घटनेतील तथ्य, तपास, कारवाई आणि न्यायाची प्रतीक्षा यांचा आढावा घेणारा हा लेख...
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत, रामायणावर आक्षेपार्ह नाट्य सादर करण्याचा निर्लज्जपणा केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तो रोखण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावलेल्या, यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत, हे कलाकारांनी लक्षात घ्यायला हवे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र गुरुकुल विभागाच्या वतीने आयोजित नाटकामध्ये प्रभू रामचंद्र व सीता माता यांच्या विषयी अपशब्द काढले गेले व त्यांची विटंबना करण्यात आली, त्याविरोधात अभाविप पुणे महानगर व अन्य संघटनांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा ने आज विद्यापीठ परिसर दणाणला. जय श्रीराम च्या घोषणा परिसरात आणि मोर्चा निघालेल्या मार्गावर दिल्या जात होत्या.यावेळी हजारो विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'शासन आपल्या दारी'प्रमाणे कौशल्य विकास विभागाने आखलेला 'स्किल सेंटर ऑन व्हील' हा उपक्रम अत्यंत नाविन्यपूर्ण आणि एक चांगला उपक्रम आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहतील, असा विश्वास आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार, २६ जानेवारी रोजी केले.
आसाम सरकारने ४० लाख महिलांना आर्थिक बळ देतानाच लोकसंख्या नियंत्रण, मुलींचे शिक्षण तसेच वृक्षारोपण असे तीन हेतू साध्य होतील, याची काळजी घेतली आहे. भाजपने आपल्या महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. त्याचवेळी ज्या काँग्रेसने मणिपूरकडे दुर्लक्ष केले, तीच आज तेथून न्याय यात्रा काढत आहे, हा विरोधाभास समोर आला आहे.
भारतीय शेतीने याआधी पारंपरिक बैलगाडी आधारित होण्यापासून, ट्रॅक्टर आधारित होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. आता शेतीच्या कामांमध्ये होणारा ड्रोनचा वापर हरित क्रांतीची तिसरी लाट ठरणार आहे. कृषी-ड्रोन तंत्रज्ञान आपल्या शेतीच्या पद्धतींना आधुनिक बनवण्यात आणि त्यामध्ये बदल घडवण्यात खर्या अर्थाने यशस्वी होत असल्याचे सिद्ध होत आहे.
चर्मकार समाजाच्या विद्यार्थ्याच्या हाताला काम मिळण्याच्या उद्देशाने नागपूर जिल्ह्यात 'सेंटर ऑफ एक्सलंस' तयार करण्यात येणार आहे. याठिकाणी विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येईल. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी ही माहिती दिली आहे.
पक्ष्यांच्या केवळ पिसांचा संग्रह असणारे, जगातील एकमेव आणि भारतातील पहिले पक्ष्यांच्या पिसांचे संग्रहालय सुरू करणार्या ‘फेदर लायब्ररी’च्या संस्थापिका ऐशा मुन्शी यांच्या अनोख्या प्रवासाचे शब्दचित्रण...
सध्या जग निर्णायक टप्प्यात आहे आणि बदलाचा कल भारताच्या बाजूने आहे. ग्लोबल साऊथमध्ये भारताचा उदय हा आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये महत्त्वाचा मुद्दा असल्याचे मत हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी नुकतेच केले आहे.
भारतातील बेरोजगारी वाढत असून त्यावर सत्ताधारी भाष्य करत नाहीत, असा आरोप हा नित्याचाच. पण, विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये नेमके किती तथ्य आहे? याबाबतचे सरकारी तसेच अन्य संस्थांचे आकडे काय सांगतात? यांचा उहापोह करणारा हा लेख....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'विकास भारत संकल्प यात्रे'च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही पंतप्रधानांनी सुरू केला. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी महिला किसान ड्रोन केंद्राचे उद्घाटनही केले.
दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.6 इतकी मोजली गेली आहे.तीन दिवसांत भूकंपाचे धक्के बसण्याची ही दुसरी वेळ आहे. दि.३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले.