काँग्रेस आणि राजदचे धोरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पायदळी तुडविण्याचे आहे, तर मोदी मात्र बाबासाहेबांना आपल्या ह्रदयात ठेवतो; अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये सिवान या लालूप्रसाद यादव यांच्या बालेकिल्ल्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शुक्रवारी फुंकले.
Read More
वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. तसेच जनसंवाद कार्यक्रमात बदल्याची निवेदने स्वीकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारीतील ५३ अनिवासी भूखंडांच्या विक्रीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ई-लिलावासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.
आता शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवार, दि. २ जून रोजी याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, व्हॉट्सअपवर पाठवली गेलेली नोटीस ग्राह्य धरली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांचे खाते जाहीर करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आल्याची माहिती आहे. शुक्रवार, २३ मे रोजी त्यांचे खाते जाहीर करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी २२ हजार, ९१९ कोटी रुपयांची पीएलआय योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारात स्पर्धात्मक वातावरण तयार झाले असून, मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत यशस्वी होणार आहे.
(Hearing on Prashant Koratkar's Bail Application) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात कोल्हापूर सत्र न्यायालयात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात झाली आहे. प्रशांत कोरटकरला व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने मागील सुनावणीत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती. यानंतर आज प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पा
( applications for Pink e-rickshaw ) “महिला व बालविकास विभागाच्या दि. ८ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महिला व मुलींना रोजगारनिर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे यांसह सुरक्षित प्रवासासाठी गरजू महिलांना पिंक (गुलाबी) ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उत्पादन क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना आणली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी ती अत्यंत महत्त्वाची अशीच असून, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे काम त्यातून होत आहे. विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात त्यातून आकर्षित होत असून, रोजगारवाढीचे कामही ती करत आहे.
भारताच्या ऊर्जाक्षेत्रात सध्या घडत असलेला बदल हा केवळ आकड्यांचा सारीपाट नाही, तर भारताने कमावलेल्या आत्मविश्वासाची आणि दीर्घकालीन रणनीतीची कहाणी आहे. २०२४-२५ सालच्या पहिल्या आठ महिन्यांतच भारताने सोलार सेलच्या आयातीत २० टक्के आणि सोलार मॉड्यूल्सच्या आयातीत तब्बल ५७ टक्के घट नोंदवली आहे. अर्थात, घट म्हटल्यावर अनेकांना हे नकारात्मक वाटेलही; पण वास्तविक हा भारताच्या ‘आत्मनिर्भरते’चा आणि ऊर्जास्वावलंबनाचा नवा अध्याय आहे.
सेमीकंडक्टर या आधुनिक तंत्रज्ञानासाठी भारत एकेकाळी, बाहेरील देशांवर अवलंबून होता. मात्र, या क्षेत्रातसुद्धा भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी कंबर कसली आहे. सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी लागणारी सर्व संसाधने, भारताकडे व्यापक स्वरूपात आहेत. त्यामुळेच सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे...
स्मार्टफोन प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग. याच स्मार्टफोनच्या क्षेत्रात भारत दिवसेंदिवस भरारी घेण्याच्या तयारीत आहे. गेल्या आठवड्याभरात स्मार्टफोन्सच्या निर्यातीने आर्थिक वर्ष २०२४ या वर्षात, १.३१ लाख कोटींचा टप्पा ओलांडला. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रातील आव्हाने आणि संधी काय असू शकतील, याचेच हे आकलन...
आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य आणि वैचारिकतेसाठी स्वतःचा ठसा उमटवणार्या, तळोजा येथील डॉ. वर्षा चौरे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही ४९३ घरे २० टक्के सर्वसमावेश योजनेतील असून या घरांच्या सोडतीची साठीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस शुक्रवार दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता सुरुवात झाली.
मुंबई : 'लाडकी बहिण योजने'च्या ( Ladki Bahin Yojana ) लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ २६ तारखेपर्यंत मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. नवीन अर्थसंकल्पाच्या काळामध्ये लाभार्थींना २१०० रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार केला जाईल. अर्ज पडताळणीपुर्वीच यामध्ये चार हजार महिलांनी योजनेचा लाभ थांबविण्याचे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना योग्य त्या प्रमाणे लाभ मिळणे सोपे होणार आहे.
: (Walmik Karad) बीडमधील संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणांमधील संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
(Pooja Khedkar) सर्वोच्च न्यायालयाकडून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. या प्रकरणी १४ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील सुनावणी होईपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याचे आदेश देण्यात आले.
(Aaple Sarkar) महाराष्ट्र शासनाच्या ४८५ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे 'आपलं सरकार' (१.०) वेब पोर्टल अधिक सक्षम, अद्ययावत करुन नव्या स्वरूपात तयार करा. त्याच बरोबर नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचे 'ॲप' तयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी विभागाला दिले.
(Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर निवडणुकांपूर्वी प्रचंड गाजलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना पुन्हा चर्चेत आली. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर या योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः याची जाहीर घोषणा करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यानुसार राज्यभरात विविध ठिकाणी अर्जांची फेरपडताळणी सुरू करण्यात आली आहे. तेव्हाच या योजनेतील निकष डावलून लाभ घेतलेल्य
(Ladki Bahin Yojana) ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थीं महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवार ३ जानेवारी रोजी माहिती दिली आहे. एकूण पाच निकषांच्या आधारे अर्ज अपात्र करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी योजनेसंदर्भात चर्चा केल्यानंतर छाननीचा निर्णय घेण्यात आल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या २६,००० घरांच्या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस १० जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत २६,००० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २२६४ सदनिकांच्या विक्रीकरिता जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
नवी दिल्ली : “जेव्हा आपण ‘एनसीसी’चे ( NCC ) नाव ऐकतो, तेव्हा आपल्याला आपले शाळा आणि महाविद्यालयाचे दिवस आठवतात. मी स्वतः ‘एनसीसी’ कॅडेट आहे. त्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की, यातून मिळालेले अनुभव माझ्यासाठी अमूल्य आहेत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांनी सांगितले. “एनसीसी’ तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना विकसित करते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
( Mumbai's Dabbawalas )काही तथाकथित डबेवाला संघटनांचे पदाधिकारी हे मुंबईच्या डबेवाल्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिला असल्याचे गैरसमज पसरवत असले तरी डबेवाल्यांच्या अधिकृत संघटनेने भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला असल्याचे, उत्तर मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी स्पष्ट केले. महायुती सरकारने डबेवाल्यांसाठी घरे देण्यासह जी कामे केली ती पाहता हा पाठिंबा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबईतील सिडकोच्या २६ हजार घरांची लॉटरी निघणार आहे. विशेष म्हणजे या सोडतीला उस्फुर्त प्रतिसाद असून पहिल्या चोवीस तासात या घरांसाठी तब्ब्ल १२ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. सिडकोची ही घरं तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, करंजाडेसह मानसरोवर, खारघर आणि वाशी या ठिकाणी आहेत.
सिडकोच्या बहुप्रतिक्षित 'माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेसाठी केवळ चोवीस तासात बारा हजार अर्ज प्राप्त झाले आहे. दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू झालेल्या या योजनेच्या पहिल्या २४ तासांतच १२,४०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ११ ऑक्टोबर रोजी वाशी, नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गटासाठीच्या या या योजनेचे उदघाटन करण्यात आले.
(Jitendra awhad) बंगल्यावर अभियंत्याला नेऊन बेदम मारणे, चित्रपटगृहात शो बंद पाडून प्रेक्षकाला बदडणे, महिलेचा विनयभंग करणे, असे नाना कारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 22 जणांवर खोट्या गुन्ह्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी आ. आव्हाडांची अक्षरशः पळापळ सुरू आहे. अटक टाळण्यासाठी आव्हाडांनी ठाणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी न्यायालयात झालेल्या सुनावणीत दि. 3 ऑक्टोबर ही
अॅपलच्या आयफोन उत्पादनाच्या निर्यातीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आयफोनच्या उत्पादनापैकी ८५ टक्के उत्पादन निर्यात झाली असून पीएलआय योजनेचे लक्ष्य पूर्ण केले आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.
केंद सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह(पीएलआय) योजने अंतर्गत दूरसंचार उपकरणांच्या उत्पादनविक्रीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. दरम्यान, दूरसंचार उपकरणे निर्मितीची विक्री एकूण ५० हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून त्यासाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी गर्दी केलीये. राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणं आणि त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आलीये. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे जाणून घेऊया.
अर्थकारणाच्या स्थैर्यासाठी कुठलाही नकारात्मक बदल होणार नसल्याचे अर्थतज्ज्ञांनी कयास मांडला आहे. भारतीय जनता प्रणित एनडीए प्रणित सरकार बहुमताने आले नसले तरी गठबंधन सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कुठलाही धोरणा त्मक बदल होणार नाही.'मोदी झुकेगा नहीं मोदी रुकेगा नही ' असेच सुतोवाच तज्ञांनी केले आहे. पीएलआय योजना,औद्योगिक उत्पादन, मूलभूत सुविधा, भांडवली खर्च अशा अनेक योजना त्याच वेगाने आणत दुसरीकडे जनतेसाठी कल्याणकारी योजना यांचा समावेश कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
आपली कला ही लोकांना कायमस्वरुपी स्मरणात राहील, असे विरळेच. असेच एक अबोल संवादातून प्रेक्षकांशी नातं जोडणारे माईम आर्टिस्ट कुणाल मोटलिंग यांच्याविषयी...
मुंबईकरांना तात्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी टाटा पॉवरने संपूर्ण डिजिटलाईज्ड सेवा सुरु करून ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्याच्या प्रक्रियेत क्रांती घडवून आणली आहे. या नव्या प्रक्रियेमुळे आता नवीन वीज जोडणी केवळ ७ दिवसांमध्ये मिळू शकते.
आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी केवायसी अट काढून टाकली आहे. आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना केवायसीसाठी आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याची गरज भासणार नाही.
पेटीएम म्हणजेच One97 Communications कंपनीच्या नेतृत्वात नवीन बदल होणार आहे.आरबीआयच्या पेटीएम पेमेंट बँकेवरील आरबीआयच्या कारवाईनंतर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष विजय शर्मा यांच्या पेटीएम पेमेंट बँकेच्या सीईओ पदावरुन राजीनामा दिल्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालक मंडळात मोठे फेरबदल झाले होते.आता पेटीएम मनीमध्ये फेरबदल झाले आहेत. पेटीएम मनीचे माजी मुख्य अधिकारी वरूण श्रीधर यांनी पदाचा राजीनामा देत पेटीएम सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडवर निवड झाली आहे. पेटीएम पेमेंट बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर राकेश सिंह
भारतीय अर्थ मंत्रालयाने भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. जागतिक पातळीवरील मंदी अथवा महागाईचे आव्हान असले तरी भारताअंतर्गत वाढती उत्पादन मागणी, विकास दर वाढ व स्थिर किंमती यामुळे अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत राहिले असे अनुमान अर्थमंत्रालयाने आपल्या अहवालात केले आहे. यावेळी मान्सून देखील समाधानकारक स्थितीत असल्याने शेतकी उत्पादनात देखील वाढ होईल असे भाकीत मंत्रालयाने केले आहे.
आपल्या जीवनात आपण अनेक अडचणींचा सामना करतो. आयुष्यात येणार्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड द्यायचे असेल, तर स्वयंशिस्त महत्त्वाचीच. याच स्वयंशिस्तीच्या पैलूवर आणखीन खोलवर प्रकाश टाकणारा हा लेख...
मानवी मानसशास्त्राच्या गुंतागुंतीच्या परिघात, self discipline and honesty या दोन गुंफलेल्या संकल्पना वैयक्तिक विकासाचे आधारस्तंभ म्हणून उभ्या आहेत. एकत्रितपणे, ते एक गतिमान जोडी तयार करतात, जी जीवनातील आव्हाने पेलायची, आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करण्याची आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची आपली क्षमता दर्शवते.
फॅशन... अनेक मोठ्या इंडस्ट्रीजपैकी एक. ट्रेंडिंग कपडे, चपलाबूट आणि तत्सम इतर गोष्टींचं वाढणारे मार्केट. का लागतात आपल्याला ट्रेंडिंग कपडे आणि चपला? दोन ते तीन जोडांवर भागणार असले तरीही नवीन स्टाईलचा बूट विकत घ्यायला आपण का धजावतो? बरं, आपण करत असलेल्या या ट्रेंडिंग फॅशनमुळे कोणकोणत्या घटकांवर आणि काय परिणाम होतात? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी आज ‘फास्ट फॅशन’ म्हणजे नेमकं काय, ते पाहूया.
सरकारने उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना १३ अब्ज डॉलरचे इन्सेक्टिव्ह दिल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. २०२० मध्ये केंद्र सरकारने उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करतानाच पीएसआय योजना बाजारात आणली होती. या योजनेअंतर्गत १३ अब्ज डॉलर सरकारने दिल्याचे सरकारी अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
आपल्या मनाला सुसाट विचार करण्यापासून रोखणे अशक्य आहे, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणून, विचार आणि भावना दूर ढकलल्याने त्यांचे व्यवस्थापन करणे कठीण होईल. त्याऐवजी स्वयंशिस्त सुधारण्याचा सर्वोत्तममार्ग म्हणजे प्रतिरोधक विचार आणि भावना व्यवस्थित लक्षात घेणे, स्वीकारणे आणि त्यापासून दूर जाणे, जेणेकरून आपण पुढे जाऊ शकू आणि जे काही आपल्याला करायचे आहे, ते पूर्ण करू शकू.
शिस्तबद्ध मुले त्यांच्या भावना आणि वर्तन नियंत्रित करण्यास आपसूक शिकतात आणि ते जबाबदार निवडी करण्यात अधिक सक्षम बनतात. शैक्षणिक यशासाठी हे खूप आवश्यक आहे. कारण, जे विद्यार्थी आपल्या भावनिक आवेगांवर नियंत्रण ठेवू शकतात ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात, ते शाळेत चांगले शैक्षणिक आणि अवांतर प्रदर्शन करतात. शिवाय, आत्म-शिस्त ही जीवनातील यशासाठी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.
वैयक्तिक विकासाच्या क्षेत्रात, स्वयं-शिस्तीची संकल्पना सर्वोच्च ठरते. आपण आत्म-शिस्त या मानसशास्त्रातील अत्यंत गरजेच्या क्षेत्राबद्दल ऊहापोह करणार आहोत. त्या अनुषंगाने तुमचे विचार, भावना आणि वर्तन तुमच्या एकाग्र, वचनबद्ध आणि सदैव प्रेरित राहण्याच्या क्षमतेमध्ये कसे योगदान देतात, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत मुंबई विद्यापीठाला पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी रुपये २० कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थांचे बळकटीकरण करून पायाभूत सुविंधाचा विकास आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पी-एम उषा अंतर्गत देशातील विविध उच्च शिक्षण संस्थांना निधी मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या उपक्रमाचे डिजिटल लाँचिंग केले जाणार असून, मुंबई विद्यापीठा
अरविंदराव गोखले रोज संध्याकाळी शाखा वेषात शाखेवर पूर्ण वेळ उपस्थित असायचे. बाल-तरुणांचे विविध खेळ, शारीरिक कार्यक्रम ते घेत असत. त्यात स्वत:ही आवर्जून सहभागी व्हायचे. सांघिक गीत हा त्यांच्या आवडीचा विषय.
नुतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट आणि मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोशिएशन यांनी आज त्यांच्या दादर पश्चिम येथील कार्यालयात अयोध्यामधील श्रीराम जन्मभूमीवरील मंदिर न्यासातर्फे पाठवण्यात आलेल्या पूजीत अक्षता कलशाचे विधिवत पूजन करून स्थापना केली. विहिप चे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर व भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले.
शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाची आणि सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून भ्रष्टाचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला खरा. पण, या कारवायांचा वापर जिनपिंग यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीही रीतसर करून घेतला. ते लक्षात घेता, भ्रष्टाचाराला केवळ भांडवलवादाची देण समजणार्या साम्यवाद्यांनाही भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यात अपयश आले, हेच जळजळीत वास्तव!
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग अंतर्गत विविध पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे सरळसेवा भरतीच्या माध्यमातून एकूण ३४५ रिक्त जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. तसेच, अर्ज करण्याकरिता दि. १३ डिसेंबर २०२३ पासून अर्जस्वीकृतीस सुरुवात होणार आहे. तर दि. ३१ डिसेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे.
होमियोपॅथी औषधांवर एक नेहमी केली जाणारी टीका म्हणजे, होमियोपॅथीच्या छोट्या गोळ्यांमध्ये काहीही शक्ती नसते किंवा असा गैरसमज पसरवण्यात येतो की, होमियोपॅथीची औषधेही ’placebo effect’ची असतात, तर असे काहीही नसते. होमियोपॅथीची औषधे ही संपूर्णपणे नैसर्गिक असून, निसर्गात मिळणार्या व सर्व औषधी गुणधर्म असलेल्या गोष्टींपासून ही औषधे तयार केली जातात.