मोठी बातमी: आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना केवायसीची गरज नाही

सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी केवायसी अट काढून टाकली

    15-May-2024
Total Views | 214

SEBI
 
 
मुंबई: आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी केवायसी अट काढून टाकली आहे. आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना केवायसीसाठी आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याची गरज भासणार नाही.
 
ही केवायसी अट काढून टाकल्याने आता गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे अधिक सोपे होणार आहे. Know Your Customer (KYC) याआधी म्युच्युअल फंड, बँक,आर्थिक संस्था, इतर संस्था गुंतवणूकीपूर्वी मागत मात्र आता १४ मे परिपत्रकानुसार सेबीने नियमात फेरबदल केले आहेत.
 
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी केवायसी अटीची पूर्तता करण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंतची मुदत दिली होती. परंतु या नवीन निर्णयामुळे आता गुंतवणूक सुकर होणार आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना यापूर्वी बँक पासबुक, अकाऊंट स्टेटमेंट या आधारे केवायसी करणे गरजेचे होते.
 
'सिक्युरिटीज मार्केटमधील भागधारकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे आणि ग्राहकांकडून व्यवहार सुलभतेसाठी,१२ ऑक्टोबर २०२३ च्या मास्टर परिपत्रकातील तरतुदींचे पुनरावलोकन केले गेले आहे आणि जोखीम व्यवस्थापन फ्रेमवर्क सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,' असे परिपत्रकात नमूद केले आहे.
 
याशिवाय एजन्सी केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सीला मात्र गुंतवणूकदारांचे पॅन व पत्ता यांची खात्री करावी लागणार आहे. या माहितीच्या आधारे पॅन व आधार कार्ड लिंक आहे की नाही याची शहानिशा व्यक्तीची माहिती मिळताच दोन दिवसांच्या आत करावी लागणार आहे.
 
रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क आधारे ग्राहकांच्या माहितीची शहानिशा केवायसी रेकॉर्ड मिळाल्यानंतर दोन दिवसांच्या आत करावे लागणार आहे ज्यामध्ये पॅन, अकाऊंटवरील नाव, पत्ता या गोष्टीचा समावेश त्यात असणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

आता थांबायचं नाही! ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

"आता थांबायचं नाही!" ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

भावनिक आणि प्रेरणादायी अशा “आता थांबायचं नाही!” या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील श्रमिकांच्या संघर्षमय आणि स्फूर्तिदायक प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट सध्या IMDb वर ८.८ इतक्या उत्तम रेटिंगसह प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वैचळ यांनी केलं असून, त्यांनी याच चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. चित्रपटात भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारिकर यांच्या महत्त्वपूर्ण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121