११ जीव वाचवता आले असते, डीसीपींनी पत्र लिहूनही सरकारचे दुर्लक्ष?; बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर!

    09-Jun-2025   
Total Views | 23

bengaluru stampede govt ignored dcp warnings before rcb felicitation chaos
 
बंगळुरू : (Bengaluru Stampede) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर येत आहे. डीसीपी एमएन करिबासवन गौडा यांनी कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला पत्र लिहून लोकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. विधानसौधा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरही आक्षेप घेतला होता.
 
डीसीपी गौडा यांनी ४ जून रोजी कर्नाटकच्या कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिवांना पत्र लिहून १० महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. ज्यात सुरक्षेच्या मुद्दाही उपस्थित केला होता. गौडा यांनी डीपीएआरच्या सचिल जी. सत्यवती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विधानसौधा येथे लाखो चाहते येण्याची शक्यता आहे. तिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे योग्य सुरक्षा व्यवस्था राखणे कठीण होईल." त्यामुळे अतिरिक्त पोलिस दल बोलवण्याची गरज आहे. तसेच सार्वजनिक प्रवेश पास रद्द करण्याची शिफारसही डीसीपींनी पत्रात केली होती. तसेच या पत्रात सीसीटीव्ही कव्हरेज आणि परिसराच्या संवेदनशीलतेबद्दलही चिंता व्यक्त केली होती.
 
 
 
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्व सांगितल्यानंतरही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चेंगराचेंगरीच्या काही तास आधी, जी. सत्यवती यांनी चाहत्यांना विधानसौधाऐवजी स्टेडियममध्ये जाण्याचे आवाहन केले. माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, अंतिम सामन्याच्या २४ तासांपेक्षा कमी कालावधीत आरसीबीच्या विजयाचा उत्सव कोणत्याही सुरक्षा प्रोटोकॉलशिवाय पार पडला.
 
भाजपकडून प्रश्न उपस्थित
 
कर्नाटकमधील विरोधी पक्षाचे नेते आर. अशोक यांनी सिद्धरामय्या सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, विधानसभा पोलिसांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून कळवले होते की, हा कार्यक्रम खूप घाईगडबडीमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यांनी असेही म्हटले आहे की "जर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात सत्तासंघर्ष सुरु नसता, तर त्या मुलांना आपला जीव गमवावा लागला नसता."
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121