ठाणे काँग्रेसमध्ये गच्छंती सुरूच

आणखी एक माजी जिल्हाध्यक्ष पक्षातून निलंबित

    08-Jan-2025
Total Views | 28
 
Congress
ठाणे : विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर आधीच काँग्रेसमध्ये गळती सुरू असताना ठाणे काँग्रेसमध्ये आजी - माजी पदाधिकाऱ्यांची गच्छंती करण्यात येत आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या कारणास्तव ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी माजी जिल्हाध्यक्ष अनिल साळवी यांना पक्षातुन निलंबीत केले आहे.
 
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी धर्म न पाळता महायुतीच्या उमेदवाराचा जाहीर प्रचार करून शिस्तभंग केल्याप्रकरणी पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. डिसेंबर २०२४ मध्ये आठ जणांना पक्षातून निलंबित करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, विधानसभा निवडणुकीत अनिल साळवी यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न करता, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार नजीब मुल्ला याचा जाहीर प्रचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. सबब काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात, आघाडी धर्म न पाळता पक्ष शिस्तभंग केल्यामुळे साळवी यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121