दिवंगत विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेत फूट

    04-Sep-2024
Total Views |

tanaji shinde
 
 
मुंबई : शिवसंग्रामचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या संघटनेत उभी फूट पडली आहे. प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी मंगळवार, दि. ३ सप्टेंबर रोजी ‘स्वराज्य संग्राम’ या नव्या संघटनेची घोषणा केली.
 
नव्या संघटनेची घोषणा करताना कराड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले, शिवसंग्राम संघटना २००१ मध्ये स्थापन झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यात लाखो कार्यकर्ते तयार झाले. विनायक मेटे यांच्या निधनानंतर ही संघटना बांधून ठेवण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला. मात्र, अलीकडे मेटे कुटुंबीयांनीच शिवसंग्राम संघटना वाटून घेतल्याने सोबतच्या कार्यकर्त्यांसाठी ‘स्वराज्य संग्राम’ संघटनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. अजित बानुगडे, अनंत देशमुख, विक्रांत आम्रे यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. स्वराज्य संग्राम संघटनेचे पहिले अधिवेशन पंढरपूरला दि. १५ सप्टेंबर रोजी होणार असून, त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येतील. त्यात संघटनेची पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे तानाजी शिंदे यांनी सांगितले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121