'गरवारे'मध्ये प्रमाण मराठी लेखन आणि आवाजाची कार्यशाळा!

    30-Jul-2024
Total Views | 142

Garware
 
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्यावतीने दि. ३ ऑगस्ट आणि ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संस्थेच्या प्रेक्षागारात दोन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी असणाऱ्या आणि भाषेच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी शोधणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त अशा 'प्रमाण मराठी लेखन कार्यशाळा' आणि 'आवाजाची कार्यशाळा' या दोन कार्यशाळा अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
 
तज्ज्ञ विषय शिक्षक या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करणार असून कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना गरवारे संस्थेकडून ई- प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक कार्यशाळेसाठी शुल्क ५०० रुपये असून दोन्ही कार्यशाळांसाठी नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना ७५० रुपये शुल्क देऊन कार्यशाळेत सहभागी होता येईल. त्यासाठी नोंदणी करण्यासाठी आपण संस्थेच्या https://www.gicededu.co.in/ संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी ८५९१५९०१७४, ९९८७३९५४५७ या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121