उबाठा गटाचा काँग्रेसला धक्का!

    01-Jun-2024
Total Views | 358
 
UBT
 
मुंबई : उबाठा गटाने नाशिकमध्ये काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेस नेते संदीप गुळवे यांनी शनिवारी उबाठा गटात प्रवेश केला आहे. तसेच संदीप गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
 
शनिवार, दि. १ जून रोजी शिवसेना भवनात माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, दिवाकर रावते आणि अनंत गीते यांच्या उपस्थितीत संदीप गुळवे यांनी पक्षप्रवेश पार पडला. संदीप गुळवे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते गोपाळराव गुळवे यांचे पुत्र आहेत. ते २०१२ ते २०१७ या कालावधीत नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य होते. मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. नाशिक जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. नाशिकमधील विविध सहकारी, शिक्षण आणि कृषी संघटनांशी ते निगडीत आहेत.
 
हे वाचलंत का? -  "वडेट्टीवारांचे मुंगेरीलाल के हसीन सपने!"
 
किशोर दराडे हे नाशिक शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाकडून पाठिंब्याची चाचपणी केल्यामुळे 'उबाठा' गटाने त्यांची उमेदवारी कापली आहे. त्यांच्याऐवजी काँग्रेस नेते संदीप गुळवे हे उबाठा गटाचे उमेदवार असतील.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121