‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची भरारी, १६ कोटींचा टप्पा केला पार

    30-Mar-2024
Total Views |
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाने यशस्वीरित्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे.
 

veer savarkar 
 
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांसह मराठी कलाकारांनी देखील या (Swatantryaveer Savarkar) चरित्रपटाला उचलून धरले आहे. आनंदाची बाब म्हणजे बॉक्स ऑफिसवर स्वातंत्र्यवीर सावरकर दरम्यान, या चित्रपटा चित्रपटाने यशस्वी कमाई केली आहे.
 
हे वाचलंत का? -  अभिनयातील ‘मुक्त’छंदी व्यक्तिमत्व!
 
दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांनी त्यांच्या सोशल मिडियावरुन एक पोस्ट करत आत्तापर्यंत चित्रपचाने किती कमाई केली ते शेअर केले आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने १६.६७ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने एकूण कमाई ११.३७ कोटी केली होती. आणि दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी १.१० कोटी कमावले आहेत. दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१० कोटी, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.७५ कोटी, चौथ्या दिवशी २.१५ कोटी आणि पाचव्या दिवशी १.०७ कोटी कमावले होते.
 

veer savarkar 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट मराठीत देखील २९ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. यात सावरकरांच्या भूमिकेला मराठीत अभिनेते सुबोध भावे यांनी आवाज दिला आहे. सुबोध भावेबद्दल रणदीप हुड्डा म्हणाले होते की, “सुबोध भावे हा एक उमदा कलाकार आहे. ज्यावेळी चर्चा सुरु होती की मराठी मराठी चित्रपटासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेला आवाज कोण देणार? त्यावेळी माझ्या डोक्यात एकच नाव आले ते म्हणजे सुबोध भावे यांचे. त्यांच्याशिवाय कुणी योग्य न्याय देऊ शकणार नाही, असे म्हणत रणदीप हुड्डा यांनी सुबोध भावे यांचे कौतुक केले.
 
पुढे ते असे देखील म्हणाले की, “मराठी भाषेत भावभावनांचा ओलावा, सशक्तपणा आहे. जो इतर कोणत्याही भाषेत नाही. मराठी भाषा तितकीच क्लिष्टही आहे. मी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अभिनय व दिग्दर्शनाच्या गडबडीत व्यवस्थितपणे शिकू शकलो नाही’ अशी कबूली देताना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट हिंदीपेक्षा मराठी भाषेत अधिक प्रभावी वाटला, असे मत अभिनेता रणदीप हुडा यांनी व्यक्त केले होते.