प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर आव्हाडांचं बाबासाहेबांबद्दल वादग्रस्त विधान! म्हणाले, "आरक्षण देऊन..."

    17-Jan-2024
Total Views | 184

Jitendra Awhad


नागपूर :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर अन्याय केला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मंगळवारी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.
 
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेतही आरक्षण ठेवायला हवं होतं. काहीकाही निर्णय असे येतात ज्यामुळे आपल्याला पटकन कळतं की, यात जातीचा वास येत आहे. न्यायव्यवस्थेकडून हो अपेक्षित नाही. न्यायव्यवस्था ही निपक्षपाती असली पाहिजे, अशी संविधानाची अपेक्षा आहे. पण खरंच असं होतं का? न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर बाबासाहेबांनी अन्याय केला," असेही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा
सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121