मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), हिंगोली अंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील तरुणांना या योजनेतून रोजगार उपलब्ध होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून संसाधन व्यक्ती या पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, मनरेगा हिंगोली अंतर्गत संसाधन व्यक्ती या पदांसाठी १०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी इच्छु आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनरेगा हिंगोली भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२३ असणार आहे.
तसेच, उमेदवाराचे वय हे १८ ते ५० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: उपजिल्हाधिकारी (रोहयो), हिंगोली, रोहयो विभाग, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली. तसेच, अधिक माहितीसाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.