मुंबई : राज्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कर्मचारी राज्य विमा महामंडळातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत विविध पदांची भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे. विविध पदांच्या अर्जप्रक्रियेसाठी अंतिम मुदत दि. ३० ऑक्टोबर २०२३ असणार आहे. त्याचबरोबर, उमेदवारांकडून अर्जशुल्क आकारले जाणार असून सामान्य प्रवर्गासाठी ५०० रुपये तर राखीव प्रवर्गांसाठी २५० रुपये अर्जशुल्क आकारले जाणार आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत होणाऱ्या भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.