पावसामुळे यंदा साखर उत्पादनात घट.
ऑगस्ट महिन्यातील कमी पावसाच्या नोंदीने ऊसाच्या उत्पादनातही घट
मुंबई:महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाल्याने मात्र साखरेच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून आले आहे.५९ टक्के घट पावसात झाल्याने यांचा फटका साखर उत्पादनाला बसला. महाराष्ट्रातील साखर उत्पादनात १४ % यंदा घट झाली आहे.गेल्या ४ वर्षात पहिल्यांदाच उत्पादनात घट यावेळी पाहायला मिळाली.यामुळे निर्यातीत याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्र क्रमांक १ चे साखर उत्पादक राज्य आहे.त्यामुळे कदाचित महागाई दरात साखरेची भर पडल्यास याचा देशस्तरावर परिणाम होऊ शकतो.पश्चिम महाराष्ट्रात भारतातील एकूण साखर उत्पादनापैकी २/३ उत्पादन होते.मागील वर्षी १०.५ मिलियन मॅट्रिक टन वरून घटून ऑक्टोबर १ पर्यंत ९ मिलियन मॅट्रिक टन पर्यंत उत्पादनाची नोंद होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.