राजस्थानमध्ये परिवर्तन होणारच; फडणवीसांचा गेहलोत सरकारवर घणाघात!

    12-Sep-2023
Total Views | 49
 
Fadnavis
 
 
जोधपूर: राजस्थानमध्ये सुरू असलेल्या परिवर्तन यात्रेला जनतेचा ज्या प्रकारचा पाठिंबा मिळत आहे, त्यावरून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होणार आहे, हे निश्चित आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या राष्ट्रीय मंत्री अमृता रहाटकरही उपस्थित होत्या. राजस्थानमध्ये भाजपकडून चार वेगवेगळ्या परिवर्तन यात्रा काढल्या जात आहेत. हा प्रवास आता जैसलमेर, बारमेर, जालोर, सिरोही मार्गे पाली येथे पोहोचला आहे. १८दिवसांच्या ५१ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या प्रवासाचा समारोप जोधपूर शहरात होणार आहे.
 
विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "यावेळी राजस्थानच्या जनतेने मोदीजींसोबत सरकार येणार असल्याचे मनाशी बांधले आहे. काँग्रेस आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची पोकळ आश्वासने ज्या प्रकारे समोर येत आहेत, त्यामुळे यावेळी राजस्थानमध्ये बदल घडून येईल, असा पूर्ण विश्वास आहे." असं फडणवीस म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121