संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे: नितेश राणे

    11-Sep-2023
Total Views | 48
 
Rane
 
 
मुंबई : संजय राऊत यांची भाषा पाकिस्तानचे एजंट असल्यासारखी आहे. अशा लोकांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे असे भाजप आ. नितेश राणेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील नितेश राणेंना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. यावेळी राणे म्हणाले की, आमचं सरकार सर्वांना न्याय देईल. G20मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वजन समजणार असल्याचे राणे म्हणाले. भात शेतीच्या नुकसानीबाबत आम्ही अहवाल मागितला आहे. राज्य सरकार म्हणून जी काही मदत करता येईल ती आम्ही करु असे नितेश राणे म्हणाले.
 
नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या जळगाव दौऱ्यावर देखील टीका केली. "प्रशासनाने आदेश देऊनही नाक रगडायला जळगावला गेले आहेत. स्वतःचे कार्यक्रम बंद झाल्यानं दुसऱ्याचं काय चाललंय यावर त्यांचे कार्यक्रम चालतात. राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रोटोकोल कळत नाही. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना बघितले पण नाही आणि हल्ली शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. उद्धव ठाकरे हे पावसात भिजले होते की संजय राऊतांनी बिसलेरीनं पाणी ओतलं होतं." अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121