'मराठी यायलाच हवं, माझं तर तो आवडता विषय' - अदा शर्मा

    24-May-2023
Total Views | 330

ada sharma 
 
मुंबई : 'द केरला स्टोरी' चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवड्यात २०० कोटींपेक्षा जास्त गल्ला केवळ भारतातून त्याने जमवला आहे. इतर चित्रपटाप्रमाणे केवळ दिग्दर्शक आणि निर्माते या चित्रपटाविषयी बोलत नसून अभिनेत्री अदा शर्माही यात मागे नाही. चित्रपट, कथानक आणि सामाजिक समस्या सर्वच विषयांवर उत्फुर्तपणे आपली मते अदा मांडते आहे. नुकत्याच एकज मुलाखतीत ने मराठी भाषेबाबत वक्तव्य केलं आहे.
 
अदा शर्माच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक मराठी कविता आपल्याला पाहायला मिळतात. ती म्हणते, "मला मराठी भाषा खूप आवडते. मला मराठी कविता आवडतात आणि त्या मी अनेक वर्षांपासून म्हणत आले आहे. शाळेतही मराठी हा माझा आवडता विषय होता. मला आणि माझ्या पालकांना असं वाटतं की, जर तुम्ही महाराष्ट्रात जन्मला आहात, वाढला आहात तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे. प्रत्येकालाच मातृभाषेबरोबरच देशभरातल्या शक्य तितक्या इतर भाषांची प्राथमिक माहिती असायला हवी.”
 
अदला उत्तम मराठी बोलता येतं. आपण ज्या भागात जन्मलो, वाढलो, त्या भागातील भाषा आपल्याला यायला हवी, असे म्हणत तिने तिला मराठीची आवड कशी लागली ते सनीतले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121