सेंगोल म्हणजे काय? का स्थापन करणार नव्या संसद भवनात?

    24-May-2023
Total Views |

rajdand 
 
मुंबई : भारतीय प्रथा परंपरा पाहता, राज्यसत्तेचे हस्तांतरण होताना राजदंडही नव्या राज्याकडे जातो. राजदंडाचे रूप म्हणजे सेंगोल. हे सेंगोल तामिळ नाडू राज्यातून मागवून नव्या सांसद भवनात ठेवण्याचे ठरवण्यात येत आहे. याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
 
अमित शहा म्हणाले, "या मागे युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे. सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले. याबाबतची माहिती पीएम मोदींना मिळताच त्याची कसून चौकशी करण्यात आली. मग ते देशासमोर ठेवायचे ठरले. यासाठी, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा दिवस निवडला आहे."
 
सम्माई या तामिळ शब्दाचा अर्थ निष्ठा असा होतो. राजदंड हा संस्थानिक आणि राज प्रतिनिधींच्या राजसत्तेचे प्रतीक आहे. या सेनगोळच्या इतिहासात १९४७ मध्ये १४ ऑगस्टच्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी तामिळ नाडुकडे हा राजदंड सुपूर्द केला. जे न्यायय आणि निपक्षपाती सरकार चालवतात त्यांना राजदंड दिला जातो.
अग्रलेख
जरुर वाचा
एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड..

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121