रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली २६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

    17-Nov-2023
Total Views | 29

ramdas futane 
 
मुंबई : वात्रटिका रचून हसवणारे व आपल्या साहित्यातून राजकीय रंगावर नेमाने भाष्य करणारे कवी रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली २६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. शिरोळ येथील निमशिरगाव येथे रविवारी दि. १९ नोव्हेम्बर रोजी हे संमेलन संपन्न होत आहे. तसेच यावेळी समाजरत्न, साहित्यरत्न आणि शेतकरी राजा पुरस्कारांचे वितरणही होईल.
 
या संमेलनाची सुरूवात महादेव मंदिरातून ग्रंथदिंडीने होईल. यावेळी डॉ. धवलकुमार एस. पाटील, डॉ. सुकुमार जे. मगदूम, डॉ. अतिक पटेल, डॉ. अजित बिरनाळे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीची सुरूवात होईल. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्षांसह मान्यवरांच्याहस्ते उद्‌घाटन होईल. स्वागताध्यक्ष डा. विश्वनाथ मगदूम पाहुण्यांचे स्वागत करतील. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, गणपतराव पाटील, वैभव नायकवडी, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, प्रा. डॉ. रणधीर शिंदे, एसआयटीचे एक्झि. संचालक अनिल बागणे, अशोक माने आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्यांच्या उपस्थितीत उदघाटन होईल. यावेळी साहित्यसुधा स्मरणिकेचे प्रकाशन, तसेच विविध पुरस्कारांचे वितरण होईल. दुसऱ्या सत्रात 'राजकारणाचे धिंडवडे – सामान्य माणसाची भूमिका' विषयावर परिसंवाद आहे. तर दुपारी तिसऱ्या सत्रात कथाकथन, कवी संमेलन होणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121