इरेडाच्या आयपीओची घोषणा

    16-Nov-2023
Total Views | 62
ireda

मुंबई : भांडवल उभारणीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील अक्षय ऊर्जा संबंधित कंपनी इरेडाचा (भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था - आयआरईडीए) आयपीओ पुढील आठवड्यात बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने गुरुवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. कंपनीचा आयपीओ २१ नोव्हेंबरला उघडेल आणि गुंतवणूकदार २३ नोव्हेंबरपर्यंत आयपीओसाठी अर्ज करू शकतात.
 
इरेडा आयपीओमध्ये रु. १० चे दर्शनी मूल्य असलेले ७0 कोटी शेअर बाजारात आणणार आहे. ज्यात ४० कोटी ३१ लाख ६४ हजार ७०६ हे नव्याने बाजारात आणले जातील तर तर २६ कोटी ८७ लाख ७६ हजार ४७१ शेअर 'ऑफर फॉर सेल' अंतर्गत जारी केले जातील. या शेअर विक्रीद्वारे सरकार कंपनीतील आपला हिस्सा बाजारात विक्रीसाठी आणणार आहे. दोन्ही प्रकारचे शेअर मिळून कंपनीचा आयपीओ हा ६७ कोटी १९ लाख४१ हजार १७७ इतक्या शेअरचा आहे.
 
इरेडाच्या एका शेअरची किंमत ३० ते ३२ रुपये इतकी असणार आहे. आयपीओसाठी अर्ज करताना किमान ४६० शेअर्सचा एक लॉट खरेदी करणे आवश्यक असेल. आयआरडीएच्या आयपीओ मधील काही शेअर कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. तर ५० टक्के शेअर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.
 
कंपनी आयपीओद्वारे उभारलेली रक्कम तिचा भांडवली आधार वाढवण्यासाठी आणि भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करेल. इरेडा ही देशातील सर्वात मोठी ग्रीन फायनान्स नॉन-बँकिंग कंपनी आहे. कंपनीच्या आर्थिक निकालांवर नजर टाकल्यास, २०२३-२४ या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान कंपनीचा महसूल ४७ टक्क्यांनी वाढून २३२० कोटी रुपये झाला आहे. तर नफा ४१ टक्क्यांनी वाढून ५७८ कोटी रुपये झाला आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत इरेडाचे चेअरमन आणि एमडी प्रमोद कुमार दास यांनी दिली.
 
त्यासोबतच त्यांनी कंपनीच्या पुढील योजनांविषयी सुद्धा माहिती दिली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत आयडीबीआय कॅपिटलचे एमडी आणि सीईओ कमल कांत उपाध्याय, बँक ऑफ बडोदा कॅपिटलचे एमडी संजीव सराफ हे देखील उपस्थित होते.  आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स, बीओबी कॅपिटल मार्केट्स आणि एसबीआय कॅपिटल हे आयपीओचे प्रमुख व्यवस्थापक आहेत. आयपीओ बीएसई-एनएसई वर सूचिबद्ध होईल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121