मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Om Birla at Mahakumbh) प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात देशविदेशातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. शनिवार, दि. १५ जानेवारी रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाकुंभात उपस्थित राहून पवित्र स्नान केले. यावेळी त्यांनी गंगा, यमुना आणि सरस्वती यांचे आशीर्वाद घेतले आणि देशवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी कामना केली. 'महाकुंभ हा समतेचे आणि समरसतेचे प्रतीक आहे, जिथे प्रत्येकजण, जाती-धर्माचा विचार न करता एकत्र येऊन श्रद्धेच्या संगमात न्हाऊन निघत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का? : सर्वोच्च न्यायालयाचा रणवीर अलाहाबादियाला झटका!
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, महाकुंभ हे भारताच्या आध्यात्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे. हा आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि धर्माचा उत्सव आहे. येथे संतांचे वचन, त्यांचा प्रभाव आणि भक्तांची अपार भक्ती दिसून येते. माता गंगेचा आशीर्वाद सर्वांवर राहतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद येतो. वेद आणि पुराणांमध्ये त्याचा विशेष उल्लेख आहे. महाकुंभ केवळ आंतरिक ऊर्जा आणि चेतना जागृत करत नाही तर आत्मा आणि मनाची शुद्धता देखील प्रदान करतो.
विश्वास हे जीवनातील सर्वात मोठे सामर्थ्य असल्याचे सांगून पुढे ते म्हणाले की, हा उत्सव राजकारणाच्या पलीकडे सामाजिक आणि आध्यात्मिक सौहार्दाचे निमित्त आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचे येथे आगमन झाले आहे, खेड्यापाड्यातून आणि शहरातून शहरातून या कार्यक्रमाची विशालता आणि पावित्र्य दिसून येते. महाकुंभ केवळ आंतरिक ऊर्जा आणि चेतना जागृत करत नाही तर आत्मा आणि मनाची शुद्धता देखील प्रदान करतो.