पुन्हा एक नवीन टोरेस! छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकदारांना ३५ कोटींचा गंडा

दीड हजार गुंतवणुकदारांना फटका, पोलीसांकडून दोन जणांना अटक

    20-Jan-2025
Total Views | 70

 

 
scam
 
 
 
 
 
छत्रपती संभाजीनगर : राज्यात दर महिन्याला भरपूर परताव्याचे अमिष दाखवून फसवणुक करणारा टोरेस घोटाळा गाजत असतानाच आता संभाजीनगरमध्ये असाच एक घोटाळा समोर आला आहे. क्विक स्टार्ट २४ ग्रुप या कंपनीने गुंतवणुकदारांना महीना ३ टक्के देण्याचे अमिष दाखवत दीड हजार गुंतवणुकदारांना तब्बल ३५ कोटींचा गंडा घातला आहे. मुळच्या गुजरात येथील या कंपनीच्या कार्यालयास टाळे लावून चालक फरार झाल्यामुळे गुंतवणुकदार हवालदिल झाले आहेत.
 

या कंपनीनेही टोरेस सारखीच कार्यप्रणाली वापरत गुंतवणुकदारांच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील जळगाव रोडवर या कंपनीचे अलिशान कार्यालय होते. गुंतवणुकदारांना प्रभावित करण्यासाठी या कंपनीचे चालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांनी मोठे सेमिनार घेतले. या कंपनीत एका वर्षासाठी १लाख रुपये १० महिन्यांसाठी गुंतवल्यास महीन्याला ३ टक्के परतावा आणि परदेशी सहल असे अमिष कंपनीकडुन दाखवण्यात आले होते.

 

कंपनीकडुन सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे परतावा मिळत होता, पण अचानक पैसे येणे बंद झाल्यामुळे गुंतवणुकदारांचे धाबे दणाणले. कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली असता कंपनीचे कार्यालय बंद झाल्याची माहीती मिळाली आणि संचालकांचा फोन लागायला लागला. त्यामुळे घाबरलेल्या गुंतवणुकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. आतापर्यंत या घोटाळ्याची व्याप्ती उघड होत आहे. सरकारी अधिकारी, निवृत्त शिक्षक हेही फसवले गेले आहेत. निवृत्त शिक्षक नाथाराव काकडे यांना १० लाखाचा तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधून निवृत्त झालेले सरताजसिंह चहल यांना तब्बल २१ लाख ५०हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

 
या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी संचालक हर्षल गांधी, प्रतीक शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपासास सुरुवात केली आहे. त्या संचालकांपैकी शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल तांदळे यांना अटक केली आहे. बाकीच्या सर्व आरोपींचा तपास सुरु आहे. त्यातच समाजमाध्यमांवर हर्षल गांधी याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तो पोलीस उगाचच कुठल्याही गोष्टीची चौकशी करतात, त्यांना काहीच आर्थिक ज्ञान नसते. असे काही तो त्या व्हिडिओमध्ये बरळलेला दिसतोय.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या दि. ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी मंत्रालय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121