भारतीयांची स्कूटर्सला पसंती वाढली, २०२४ मध्ये २० टक्क्यांनी विक्री वाढली

एकूणच वाहनांची संख्या वाढली, गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ

    15-Jan-2025
Total Views |

 

 
co
 
 
 
 
नवी दिल्ली : भारतातील वाहन क्षेत्राला सुगीचे दिवस येण्यास सुरुवात झाली आहे. २०२३ या वर्षीच्या तुलनेत २०२४ या वर्षात वाहनांच्या विक्रीने तब्बल १२ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सोसायटी ऑफ इंडीयन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स ( एसआयएएम) कडून मंगळवारी प्रकाशित झालेल्या अहवालात ही माहीती समोर आली आहे. २०२४ या वर्षात २ कोटी पन्नास लाखांपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली आहे. या विक्रीत प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. या सगळ्यापेक्षा बाजी मारली आहे ती स्कूटर्सच्या विक्रीने, २०२३ च्या तुलनेत तब्बल २० टक्क्यांची वाढ नोंदवत १ कोटींपेक्षा जास्त विक्रीचा टप्पा गाठला आहे.
 

प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये ज्या वाहनांमधून प्रवासी वाहतुक केली जाते अशा सर्वच वाहनांचा समावेश होतो. यामध्ये चारचाकी गाड्या, व्हॅन्स, बसेस यांसारख्या वाहनांचा समावेश होतो. यावाहनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० लाखांची वाढ झाली आहे. त्यातुलनेत तीनचाकी वाहने म्हणजे रिक्शांसारख्या वाहनांच्या मागणीत वाढ होत ७० लाखांहून अधिक विक्री झाली. सर्वात कमी विक्री नोंदवली आहे ती व्यावसायिक वापराच्या वाहनांनी. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांची घटच होत फक्त ९ लाख ५० हजार वाहनांची विक्री झाली. ऐन दिवाळीसारख्या सणासुदीच्या मोसमात वाहन विक्रीने जोर पकडला असे दिसत आहे.

 

यात सर्वात जास्त मागणी नोंदवली ती दुचाकी विक्रीने. गेल्यावर्षीच्या तुलनेत १४.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातही स्कूटर्सच्या मागणीने २० टक्के वाढीचा उच्चांक गाठत ६० लाखांपेक्षा जास्त विक्री नोंदवली आहे. याउलट मोटरबाइक्सची विक्री मात्र फक्त १२ टक्क्यांनीच वाढत, १ कोटी २० लाख इतकीच झाली. या विक्रीतही गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर – नोव्हेंबर काळातच जास्त मागणी मिळाली आहे.

 
यावर प्रतिक्रीया देताना एसआयएएमचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी सांगीतले की भारतात वाढलेली वाहनविक्री हे भविष्यासाठी मोठे सुचिन्हच आहे. भारत सरकारकडून आखण्यात येणारी अनुकुल धोरणे, पायाभूत सुविधांचा विकास यांमुळे भारतीय वाहन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर उसळी घेणार आहे अशी आशा बाळगता येईल. २०२४ हे वर्ष या क्षेत्रासाठी चांगलेच गेले त्यामुळे येणाऱ्या २०२५ साठी आशा दायक चित्र निर्माण झाले आहे हे निश्चित.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121