"महिलांना सत्ता दिल्यास सर्वकाही उद्ध्वस्त होईल", योगीराज सिंग यांचे वादग्रस्त विधान

    14-Jan-2025
Total Views | 58

Yogiraj Singh
 
नवी दिल्ली : भारताचा माजी डावखुरा क्रिकेटपटू युवराज सिंग यांचे वडील योगीराज सिंग (Yogiraj Singh) यांनी महिलांबाबत बेताल वक्तव्य केले आहे. यामुळे योगीराज सिंग यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ निर्माण झाली आहे. अशातच आता पंजाब महिला आयोग योगीराज सिंग यांच्यावर तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी माजी महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही भाष्य केले. ते एका युट्यूब चॅनेलशी बोलत असताना त्यांनी वक्तव्य केले होते.
 
प्रसिद्ध युट्यूबर समदीश भाटीयाने घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये योगीराज सिंग यांनी हे विधान केले आहे. योगीराज म्हणाले की, घरचा प्रमुख हा नेहमीच पुरूषच असायला हवा. जर पुरूष नसेल तर आईने जबाबदारी सांभाळायला हवी. पती असेल तर महिला ही कुटुंबाची प्रमुख होईल का? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांनीही हा देश चालवला होता. मात्र त्यांनी देशाला उद्ध्वस्त केले असे बोलताना वाईट वाटत आहे.
 
महिलांना कधीच सत्ता देऊ नका, त्यांना प्रेम आणि आदर द्या. त्यांना घर सांभाळायला दिले तर ते उद्ध्वस्त केले. जर महिलांना तुम्ही संधी दिली तर ते सर्वकाही त्यांच्यासाठी करतील, असेही योगीराज म्हणाले होते.
 
धार्मिक गुरूंच्या भक्तांमध्ये महिलांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ निर्माण झाली आहे. महिला या गुरूंकडे पतीला किंवा आपल्या मुलाला वश करण्यासाठी वाटेल ते करतील. त्यांच्या या विधानाने वादंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121