'मिर्झापूर ३' मध्ये होणार 'पंचायत'मधील 'सचिवजीं'ची एन्ट्री?

    02-Jul-2024
Total Views | 36
 
Mirzapur 3
 
 
मुंबई : सध्या वेब सीरीजच्या जगात दोन सीरीजची नावं प्रत्येक माणसांच्या तोंडावर आहेत ती म्हणजे पंचायत आणि मिर्झापूर. पंचायतचा नुकताच तिसरा सीझन प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर आता बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय मिर्झापूरचा तिसरा सीझन भेटीला येत आहे. रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर आता 'मिर्झापूर ३'बद्दल एक महत्वाची अपडेट समोर येत असून ती अशी की 'मिर्झापूर ३' मध्ये 'पंचायत' सीरिजमधील सचिवजी अर्थात अभिनेता जितेंद्र कुमार एका खास भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
 
'मिर्झापूर ३' मध्ये अबिनेते पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत. नुकत्याच ABP ने दिलेल्या माहितीनुसार 'मिर्झापूर ३'मध्ये सचिवजी अर्थात अभिनेता जितेंद्र कुमार झळकणार आहे. विशेष म्हणजे जितेंद्र कुमार 'पंचायत'मधील सचिवजींच्याच भूमिकेत 'मिर्झापूर ३'मध्ये दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी 'मिर्झापूर'मधील गुड्डू पंडित म्हणजेच अली फजलने देखील याविषयी अपडेट दिली होती.
 
अली फजलने ANI ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "मिर्झापूरमध्ये जितेंद्रची एंट्री क्रॉस-प्रमोशनचा भाग असणार आहे.." सचिवजी अर्थात जितेंद्र कुमार काही कागदपत्रांसाठी मिर्झापूरला येणार असे सांगितले जात असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
 
 
 
‘मिर्झापूर ३' वेब सीरीज ५ जूलैला अॅमेझोन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. यात पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका डुगल, विजय वर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी 'मिर्झापूर ३' ची निर्मिती केली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते. हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121