खरीप हंगाम अंतिम टप्प्यात

6 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

    19-Jul-2024
Total Views | 44
Kharib
 
नाशिक : यंदाचा खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून वेळेत मान्सून दाखल झाल्याने समाधानकारक पेरण्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नाशिक शहर आणि आजूबाजूचा परिसर वगळता दुष्काळी तालुक्यांबरोबरच सगळीकडे पावसाळ्याच्या तोंडी दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकरीवर्गाला चांगला गेल्याचे बोलले जात आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात सुमारे 6 लाख, 28 हजार, 700 हेक्टर क्षेत्र खरीप हंगामात लागवडीखाली आले आहे. तर मागील वर्षी 6 लाख, 26 हजार, 190 हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली होती. यंदा खरिपाचे क्षेत्र 2 हजार, 510 हेक्टरने वाढले आहे.
 
...या पिकांची झाली लागवड
मका, सोयाबीन, भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, कुळीथ, टोमॅटो या प्रमुख पिकांबरोबरच इतरही पिके घेण्यात आली. यंदा मका या पीकाचे सर्वाधिक 2 लाख, 42 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. त्याखालोखाल सोयाबीनची लागवड झाली असून एक लाख हेक्टरवर उत्पादन घेण्यात आले आहे. त्याखालोखाल भात 94 हजार, ज्वारी 600, बाजरी 61 हजार, नागली 16 हजार, तर इतर पिकांची एक लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.
 
मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
इतर वर्षांची तुलना करता, यंदा लष्करी अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे. जिल्ह्यात सटाणा, मालेगाव, देवळा आणि कळवण या तालुक्यांमध्ये नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही अळी झाडाच्या पोग्यात अंडी घालून पिकाची पूर्ण पाने कुरतडते. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली जाऊन पूर्ण पीक खराब होऊन मोठे आर्थिक नुकसान होते. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृषी विभाग पुढे सरसावला असून योग्य मशागत, भौतिक, जैविक आणि रासायनिक पद्धतींची उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
नव्याने खतांचा पुरवठा
नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात प्रामुख्याने मका, बाजरी, मूग, उडीद ही पिके लावण्यात आली आहेत. तर दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील बहुसंख्य शेतकरीवर्गाने मका, सोयाबीन, टोमॅटो ही प्रमुख, तर भुईमूग, मूग, उडीद, तीळ ही आंतरपिके लावली असून पेठ, सुरगाणा, घोटी, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे भात आणि नागलीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात खरीप हंगामात घेतल्या जाणार्‍या सर्वच पिकांची लागवड करण्यात आली असून त्यासाठी लागणारी खतं कृषी विभागाकडून उपलब्ध केली गेली. यावर्षी 2 लाख, 20 हजार टन खतांचा साठा मंजूर करण्यात आला होता. तर मागणी करण्यात आल्याप्रमाणे 71 हजार, 243 क्विंटल बियाणे कृषी विभागाकडून पुरवण्यात आले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहितीसाठी मध्य रेल्वेचे जनतेला आवाहन केले आहे. सोमवार, दि.९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजताच्या सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे ८ जण त्यांचा तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून पडले. रेल्वे प्रशासनाने या घटनेचे कारण तपासण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याचसोबत प्रवासी जनता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही ..

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

आगामी वाहतूककोंडी मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रकल्पांना गती असतानाच आता बहुप्रतीक्षित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला आता राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे.भूसंपादनासाठी आवश्यक कर्जासाठी राज्य सरकारने शासन हमी घेतली आहे, त्यामुळेविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे...

मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत, भायंदर पश्चिम येथील उड्डाण पुलाजवळील अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले, असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली ..

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा ३५० वा शाहिदी आणि गुरुगोविंद सिंगजी यांचे ३५० वा गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात नांदेड, नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121