अभिषेक आणि ऐश्वर्यानं सोडला अमिताभ यांचा 'जलसा', या बंगल्यात थाटला नवा संसार

    18-Jul-2024
Total Views | 248

abhishek  
 
 
मुंबई : कलाकारांची लग्न किंवा त्यांचा घटस्फोट या चर्चांना कायमच उधाण आलेला असतो. गेल्या काही काळापासून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्यात नेमकं काय सुरू आहे? याबद्दल तर्क वितर्क लावले जात होते. त्यांचा घटस्फोट झाला आहे किंवा होणार असे देखील म्हटले जात होते. पण या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांना स्वत: अभिषेक बच्चन याने पुर्णविराम दिला आहे.
 
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या या चर्चा सुरू असताना आता अभिषेकची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे, ज्यात अभिषेकने अमिताभ बच्चन यांच्यासोबत राहत नसल्याची कबुली दिली. त्यामुळं ऐश्वर्या आणि अभिषेक आता अमिताभ , जया बच्चन यांच्यासोबत राहात नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशननिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत अभिषेकनं आता तो राहात असलेलं घर ‘जलसा’ नसल्याचं सांगितलं होतं. अभिषेक बच्चन आणि विक्की कौशल यांची एक मुलाखत सुरू होती.
 
यात विक्कीला अभिषेकबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. त्याला विचारलं की, अभिषेकच्या घराचं नाव काय आहे? काही वेळ विचार केल्यानंतर विक्कीनं 'जलसा' असं उत्तर दिलं होतं. यावर अभिषेकनं जलसा हे उत्तर चुकीचं असून तिथे माझे आई-वडील राहतात. मी 'वत्स' बंगल्यात राहतो, जो जलसाच्या बाजूलाच आहे, असे म्हटले होते. त्यामुळे जलसा सोडून अभिषेक आणि ऐश्वर्या मुलगी आराध्या सोबत वेगळं राहात असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांचा संसारही सुरळीत सुरु असल्याचे हे उत्तर नक्कीच आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121