उद्धव ठाकरेंवर संगतीचा परिणाम! परदेशातील वास्तव्य वाढलं

    25-May-2024
Total Views | 246

Uddhav Thackeray 
 
मुंबई : राहुल गांधींची संगत असल्यानेच उद्धव ठाकरेंचे परदेशातील वास्तव्य वाढत आहेत, अशी टीका भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बच्चू कडुंनी तात्कालिक उद्वेग करून वागू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "उद्धव ठाकरे राहुल गांधींचे साथीदार झाले आहेत. राहुल गांधींचे पिकनिकसारखे राजकारण असते. टीशर्ट घालून एखाद दोन महिन्यासाठी यायचे आणि पुन्हा थंड हवेच्या ठिकाणी जायचे. शेवटी संगतीचा परिणाम असतो. उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन फेसबुक लाईव्हवर कारभार करत होते. आता राहुल गांधी यांची संगत असल्याने त्यांचे परदेशातील वास्तव्य वाढायला लागले आहे. नितेश राणे बोलले ते खरं आहे की, काय असे वाटायला लागले आहे," असा टोला त्यांनी लगावला.
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! सुरेंद्र अग्रवाल यांना २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
 
यावेळी त्यांनी बच्चू कडू यांनाही सल्ला दिला. ते म्हणाले की, "बच्चू कडू वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळी विधाने करत असतात. त्यांचे राजकारणच सनसनाटी निर्माण करणे, प्रवाहाविरुद्ध बोलणे यावर अवलंबून आहे. सत्तेचा सदुपयोग आम्ही करतो. बच्चू कडुही सत्तेत आहेत, दिव्यांग खात्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलीये. मग त्यांनी सत्तेचा सदुपयोग केला की, दुरुपयोग केला? नवनीत राणासंबंधी त्यांचा टोकाचा विरोध आहे. तो राग ते महायुतीवर, सरकारवर काढताहेत. बच्चू कडू यांनी दीर्घाकालीन राजकारण करण्याची गरज आहे. असे तात्कालिक उद्वेग करून वागू नये," असा मैत्रीचा सल्ला त्यांनी दिला आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "अनेक पक्षाची लोकं या ईडीच्या कारवाईत आहेत. बच्चू कडू यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यापासून बच्चू कडू यांचे सरकारच्या विरोधात बोलणे वाढले आहे. त्यातूनच आता ईडीशिवाय बोलणे संपत नाही. म्हणून त्यांनी तो उल्लेख केलाय. कारवाई करताना कुठलीही तपास यंत्रणा पक्षीय दृष्टिकोन ठेवत नसतात, हे बच्चू कडुंना माहित आहे. बच्चू कडू हे महायुतीसोबतच राहतील," असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121