सोने चांदी कडाडले सोन्याच्या तुलनेत चांदी महाग झाली काय आहेत दर जाणून घ्या …

सोने प्रति १० ग्रॅम ५४० तर चांदीत ३५०० रुपयांनी महागली

    20-May-2024
Total Views | 98

Gold silver
 
 
मुंबई: आज आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरची किंमत वधारल्याने बाजारात सोने चांदी किंमतीत मोठी वाढ झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.९३ टक्यांने वाढ झाली आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.९७ ते १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात सोने ०.०५ टक्क्यांनी महागले असून एमसीएक्सवरील सोन्याचे दर ७३७५० रुपयांवर पोहोचले आहेत.
 
'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतातील सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ५० रुपयांनी वाढ झाली आहे. भारतातील २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५०० रुपयांनी वाढ झाली आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५४० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४१० रुपयांनी वाढ झाली आहे.
 
मुंबईतील २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५०० रूपयांनी वाढ झाली आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ५४० रुपयांनी वाढ झाली आहे.
 
चांदीत जबरदस्त वाढ -
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोने महागली असतानाच चांदीही महागली आहे. चांदीच्या प्रति किलो दरात तब्बल ३५०० रुपयांनी वाढ झाली आहे. १ किलो चांदीचे दर ९६५०० रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईतील चांदीच्या दरात प्रति किलो ३५०० रुपयांनी वाढ होत प्रति किलो चांदी ९६५०० रुपयांनी महागली आहे. काल सोन्याची किंमत प्रति १ किलो ९३००० रुपये होती. एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.१४ टक्क्यांनी वाढ होत ९११४९.०० पातळीवर चांदी पोहोचली आहे.
 
डॉलरच्या पातळीत वाढ झाल्याने व जागतिक स्तरावर पुरवठ्यापेक्षा मागणीत वाढ झाल्याने ही भाववाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121