काँग्रेसचे 'पंजा' चिन्ह जाणार? मनसेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

    30-Apr-2024
Total Views | 107
 
Congress
 
मुंबई : निवडणूकीच्या काळात काँग्रेसच्या पंजा चिन्हाबाबत वाद निर्माण झाला आहे. मनसेने पंजा चिन्हावर आक्षेप घेतला आहे. पंजा चिन्हामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसचे पंजा चिन्ह जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
 
मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी काँग्रेसच्या पंजा चिन्हावर आक्षेप घेत पोलिस कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील बोधचिन्हात पंजा असल्याने हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे पंजा चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
हे वाचलंत का? -  "उद्धव ठाकरे नैराश्याच्या गर्तेत! त्यांची वायफळ बडबड पक्षातील नेत्यांनाच नकोशी!"
 
याशिवाय निवडणूकीच्या काळात अनेक पोलिस कर्मचारी काम करतात. त्यांच्या गणवेशावर पंजा असल्याने हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे एकतर तो काढून टाका किंवा काँग्रेसचे चिन्ह बदलण्याची मागणी मनसेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे पंजा चिन्ह जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शिवरायांच्या जागतिक दुर्गगौरावचा आम्हाला अभिमान! गिर्यारोहक, इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आनंद.

शिवरायांच्या जागतिक दुर्गगौरावचा आम्हाला अभिमान! गिर्यारोहक, इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आनंद.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकाळाचा ऐतिहासीक ठसा उमटलेल्या महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडू येथील १ अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला. जागतिक वारसा स्थळ समितीचे ४७ वे अधिवेशन दि. ६ जुलै रोजी पॅरीस येथे सुरु झाले असून ते १६ जुलै पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनातंर्गत विविध देशातीरल एकूण ३२ ठिकाणांचे मूल्यांकण व तपासणी केली जाणार आहेत. या मूल्यांकणाची प्रक्रिया शुक्रवारी सुरु झाली असून, २०२४-२५ या कालावधीसाठी भारताकडून मराठा साम्रज्याच्या साम्यर्थ्याचे प्रतिक असणाऱ्..

‘स्वयंपुनर्विकास’ ही ठाणेकरांचीही गरज ‘माझी सोसायटी‘ भावनेतून पालकत्व स्वीकारा भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांची ठाणे जिल्हा बँकेला विनंती

‘स्वयंपुनर्विकास’ ही ठाणेकरांचीही गरज ‘माझी सोसायटी‘ भावनेतून पालकत्व स्वीकारा भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांची ठाणे जिल्हा बँकेला विनंती

स्वयंपुनर्विकास ही ठाणेकरांचीही गरज आहे. लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन नागरिकांना ताकद कशी देता येईल त्याचबरोबर ठाणे जिल्हा बँकेने जास्तीत जास्त शिथिलता आणून जास्तीचे कर्ज उपलब्ध करावे. केवळ धोरण आणून चालणार नाही तर सोसायटीला ‘माझी सोसायटी’ या भावनेतून समजून घेत त्यांचे पालकत्व ठाणे जिल्हा बँकेने स्वीकारावे, अशी विनंती भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केली. ते शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीने स्वयंपुनर्विकासासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121