गुगलची कंपनीत पुनर्रचना काही कर्मचाऱ्यांना नारळ म्हणाले भारतात....

लवकरच भारतातही गुगलच्या महत्वाच्या विभागाचे स्थलांतर

    18-Apr-2024
Total Views | 192

Google
 
मुंबई: अल्फाबेटचा मालकीची व जगप्रसिद्ध कंपनी गुगलने आपल्या व्यवसायाबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने वाढलेल्या खर्चात कपात करण्यासाठी काही अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कंपनीतून डावलले जाणार आहे. ही नवी रचना कंपनीच्या अंतर्गत विषय असून याचा समाजावर काही परिणाम होणार नाही असे कंपनीच्या प्रवक्त्याने यावेळी सांगितले आहे.
 
कंपनीने एकूण किती कर्मचाऱ्यांना नारळ देणार हे मात्र कंपनीने अजून आकडेवारी सांगितली नाही. मात्र आगामी काळात कंपनीसाठी धोरणात्मक निर्णय घेताना कंपनीच्या मूलभूत कामकाज आगामी काळात भारत, शिकागो, अटलांटा, डुबलीन येथे सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावामुळे कंपनीच्या नफ्यात परिणाम होत आहे. दैनंदिन अतिरिक्त खर्चात बचत करून कंपनीचा नफा व महसूल वाढवण्यासाठी कंपनीने हा निर्णय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
"२०२३ च्या उत्तरार्धात आणि २०२४ पर्यंत, आमच्या अनेक संघांनी अधिक कार्यक्षम होण्यासाठी आणि चांगले काम करण्यासाठी, स्तर काढून टाकण्यासाठी आणि त्यांच्या संसाधनांना त्यांच्या सर्वात मोठ्या उत्पादन प्राधान्यांनुसार संरेखित करण्यासाठी बदल केले आहेत," असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे
 
गेले काही दिवस भारतातील परदेशी गुंतवणूकीत वाढ झालेली असताना अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात औद्योगिक उत्पादन व सेवा सुरू करण्यासाठी इच्छुक असताना गुगल आपले काही महत्वाचे विभाग भारतात सुरू करण्याची शक्यता आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121