पीयूष गोयल यांच्याविरोधात उबाठा उमेदवार देणार! उत्तर मुंबईत चित्र काय?
19-Mar-2024
Total Views | 48
मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या पदवीमध्ये सिल्व्हर मेडल. त्यानंतर चार्टर्ड अकाऊंटेंटमध्ये ऑल इंडिया रँक दुसरी. यशस्वी बँकर, त्यानंतर राजकारणी, राज्यसभेवर खासदार, मोदी सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री आणि आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बाल्लेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्यांची संधी. हा जीवनप्रवास आहे, भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचा. तीन टर्म राज्यसभेचे खासदार आणि सभागृहाचे नेते असलेल्या पियुष गोयल यांना यावेळी भाजपने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार केलं आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात चर्चेत आला आहे. त्यामुळेच आज आपण महाएमटीबीच्या मिशन लोकसभा या मालिकेअंतर्गंत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत.
सर्वात आधी पीयूष गोयल यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल जाणून घेऊ. मुळात पीयूष गोयल हे पेशाने चार्टर्ड अकाऊंटेंट आणि इनवेस्टमेंट बॅंकर आहेत. मात्र त्यांचे आई-वडील दोघेही सक्रिय राजकारणात होते. पीयुष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल दोन दशके भाजपाचे कोषाध्यक्ष राहीले होते. तसेच वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात वेदप्रकाश गोयल मंत्री ही होते. तसेच पीयूष गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल या तीन वेळा आमदार राहिल्या आहेत. त्यामुळे ९० च्या दशकात पीयूष गोयल भाजपाशी जोडले गेले. २०१० मध्ये त्यांना महाराष्ट्रात राज्यसभेत जाण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांच्या कामांची दखल घेत भाजपने त्यांना लागोपाठ तीन वेळा राज्यसभेत संधी दिली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जींतले नेते म्हणून देखी पीयूष गोयल यांच्याकडे पाहिलं जात. २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये ते कोळसामंत्री होते. नंतर २०१७ मध्ये सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्यानंतर ते रेल्वेमंत्री झाले. तसेच तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली आजारी असल्याने अर्थमंत्रायलयाचा कारभार देखील २३ ऑगस्ट २०१८ पासून गोयल यांच्याकडे आला होता. दरम्यान २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये पीयूष गोयल यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्री हे पद देण्यात आले. याकाळात दावोसमधून भरघोस गुंतवणुक आणण्याचे महत्त्वाचे काम ही पीयुष गोयल यांनी केले. तसेच नुकतेच युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनसोबत भारताचा करार झाला. ज्यामुळे येत्या १५ वर्षांत तिथल्या कंपन्या भारतात १०० अब्ज डॉलर गुंतवणुक करून दहा लाख रोजगारांची निर्मिती होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे भारतात परकीय गुंतवणुक आणण्यात गोयल यांचा मोठा वाटा आहे.
त्यात पीयूष गोयल आतापर्यंत राज्यसभेवर खासदार होते, पंरतु पक्षाने त्यांना लोकसभा उमेदवारी देऊन जनतेतून निवडून येण्याची संधी दिलीय. मुळात भाजपात नेहमीच पक्षातून मोठ्या पदावर असणारा नेता थेट जनतेतून निवडून आलेला असतो. उदा, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेत. तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, गृहमंत्री अमित शाह देखील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यात पीयूष गोयल यांना थेट जनतेतून निवडून येण्याची संधी उत्तर मुंबई मतदारसंघात उमेदवारी देऊन पक्षाने दिली आहे. पण याउलट काँग्रेसचा विचार केला तर,काँग्रेसमधील नेत्यांचा राज्यसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे भाजपचे मोठे नेते राज्यसभा सोडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. ज्यामुळे जनतेतून निवडून जाण्याला प्राधान्य देताना ते दिसतात. कारण त्यांना आपल्या विजयाचा विश्वास आहे.त्यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर, १९८९ पासून २००४ पर्यंत भाजपच्या राम नाईकांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केले. मात्र २००४ ला काँग्रेसच्या सेलिब्रिटी पॅर्टनमध्ये गोविंदाच्या विरोधात ते पराभूत झाले.त्यानंतर २००९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा २ लाख ५५ हजार १५७ मतांनी विजय झाला होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे राम नाईक होते, ज्यांना २ लाख ४९ हजार ३७८ मते मिळाली होती. म्हणजे फक्त ६ हजार मतांनी निरुपम यांचा २००९ ला विजय झाला होता.
मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय गणित बदलंल आणि भाजप नेते गोपाळा शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा पराभव करत. ६ लाख ६४ हजार ००४ मतांनी विजय मिळवला. त्यावेळी निरुपम यांना फक्त २ लाख १७ हजार ४२२ मते मिळाली होती. त्यावरून जनतेचा काँग्रेसवरील रोष स्पष्ट दिसत होता. कारण अनेक विकासकामांना काँग्रेसच्या काळात बगल देण्यात आली होती. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा सेलिब्रिटी पॅटर्न आणला. त्यावेळी उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने तिकिट दिले. मात्र, मतदाराला फेम नको तर काम करणारा उमेदवार हवा होता. त्यामुळेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांना तगडं आव्हान देत, गोपाळ शेट्टी ७ लाख ६ हजार ६७८ मतांनी दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यावेळी उर्मिला मातोंडकर यांना फक्च २ लाख ४१ हजार ४३१ मते मिळाली होती. यावरून विकासकामात किती ताकद असते हे गोपाळ शेट्टी यांनी विरोधकांना चांगलचं दाखवून दिलं. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा गड राहिलेला आहे. त्यात मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात.
या विधानसभा मतदारसंघात दहिसर, बोरीवली, चारकोप, कांदिवली पुर्व या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर मागाठाणे येथे शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे. आणि काँग्रेसकडे या मतदारसंघातील फक्त एकच विधानसभा आमदार आहे. मुळात उत्तर मुंबई मतदारसंघात उत्तर भारतीय , मराठी, गुजराथी आणि जैन समुदायही मोठ्या प्रमाणावर स्थायिक आहे. त्यामुळे त्यानुसार इथल्या मतांचे विभाजन होत असते. तसेच झोपडपट्टी पूर्नवसन हा इथला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर वाहतूक समस्या आणि पायाभूत सुविधा हे प्रश्नदेखील मतदारांसमोर आहेत. काँग्रेसने प्रत्येकाला मोफत घर हे स्वप्न आत्तापर्यंत प्रत्येक निवडणूकीत दाखवलं. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होताना न दिसल्याने मतदारांनी आपला कौल भाजपच्या पारड्यात टाकला, असं ही राजकीय जाणकार या मतदारसंघाच्या बाबतीत सांगतात. अशात पीयूष गोयल यांना उमेदवारी मिळाल्याने येत्या निवडणूकीत सर्वाधिक मतांनी त्यांचा विजय होईल, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.