'रेड सी ' होऊनही भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

फेब्रुवारीमध्ये निर्यात ११.८६ टक्क्यांवरून वाढ होऊन ४१.४ अब्ज डॉलरपर्यंत

    16-Mar-2024
Total Views | 44


मुंबई: रेड सी प्रकरणामुळे (Red See Crisis) मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात निर्यातीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ( Crude) तेलाच्या पुरवठा कमी झाल्यानं किंमतीतही फरक पडला.याच धर्तीवर भारत सरकारच्या वाणिज्य विभागाचे नवीन आकडे समोर आले आहेत.
 
या आकडेवारीनुसार भारतातील निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.आर्थिक वर्ष २४ मधील फेब्रुवारीमध्ये निर्यात ११.८६ टक्क्यांवरून ४१.४ अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. यामध्ये अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रोनिक, केमिकल्स, फार्मास्युटिकल, पेट्रोलियम या पदार्थात रेड सी हल्ल्यामुळे मागणी पुरवठ्यात अनिश्चिता आली होती.
 
वस्तूमधील आयातीत २०२४ मध्ये १२.१६ टक्क्याने वाढ होत ६० अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली होती.आयात वाढल्याने फेब्रुवारी २३ मध्ये वित्तीय तूट (Fiscal Deficit) मध्ये १६.५७ अब्ज डॉलरची वाढ झाली होती.
 
याविषयी बोलताना, वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल म्हणाले,' फेब्रुवारी महिन्याने आमच्या सर्व अपेक्षा ओलांडल्या आहेत. मला खूप आशा आहे की जेव्हा आपले आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपुष्टात होते तेव्हा आमची एकूण वस्तूंची निर्यात गेल्या वर्षीच्या विक्रमी निर्यातीपेक्षा जास्त असेल. याचे सर्व श्रेय आमचे निर्यातदार, व्यापारी समुदाय, व्यवसाय आणि उत्पादन युनिट यांना जाते,”
 
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतातील निर्यातीत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) बेसिसवर ६.८ % ने वाढ झाली होती.एप्रिल फेब्रुवारी २२-२३ च्या तुलनेतील ४०९.११ अब्ज डॉलर तुलनेत एप्रिल फेब्रुवारी २३-२४ मध्ये निर्यातीत तीन टक्क्याने घट होऊन निर्यात ३९४.९९ अब्ज डॉलरवर पोहोचली होती.
 
सुनिता बर्थवाल यांनी सांगितल्याप्रमाणे, WTO (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) ने भारतीय निर्यातीत ३.३ टक्क्यांची वाढ होती असे भाकीत केले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121