नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील दमोहमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गोवंश तस्करांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. बजरंग दलाचे कार्यकर्त्यांना ज्या कंटेनरमध्ये तस्करी झाल्याचा संशय होता. तो कंटेनर ताब्यात घेण्यासाठी गेल्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात हिंदू संघटनेचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. २० ते २५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पथके छापे टाकत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दमोह जिल्ह्यातील जबलपूर नाका भागातील आहे. दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना न्यू दमोह कॉलनीत गायींची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. कंटेनरमध्ये त्याची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली, ती ऐकून बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथे पोहोचले. असे सांगितले जात आहे की अचानक काही कट्टरपंथींनी बजरंग दलाच्या ३ सदस्यांवर हल्ला करत बेदम मारहाण केली. हल्लेखोरांकडे काठ्यांशिवाय धारदार शस्त्रेही होती, असा आरोप आहे. हिंदू संघटनेच्या जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच अन्य हिंदू संघटनांचे कार्यकर्ते संतप्त झाले. काही वेळातच जबलपूर नाका पोलिस चौकीसमोर शेकडो लोक जमा झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि पोलिस कारवाईत ढिलाई करत असल्याचा आरोप करण्यात आला. काही सदस्यांनी रास्ता रोकोही केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम राहिले.
दमोहचे अतिरिक्त एसपी म्हणाले की, जखमींची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सुमारे २० ते २५ आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाची बारकाईने चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच हल्लेखोर पळून गेले. पोलिसांची पथके तयार करण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरून कंटेनरही जप्त करण्यात आला आहे. हिंदू संघटनांशी संबंधित सदस्यांचा आरोप आहे की आरोपी पूर्वीही गोहत्या आणि इतर बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील आहेत.